राजकीय धग....
आज घडीला महाराष्ट्रात वेगवेगळ्या युक्त्या वापरून महाराष्ट्राला जाती पातीत विभागून टाकला जात आहे.त्यात पाठीचा कणा मजबूत असलेला विरोधकच शिल्लक राहिला नाही.
त्यामुळे जनतेच्या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवून सरकारला धग पोहचविण्याची जी धमक लागते. तसा विरोधी पक्ष व विरोधी बाकावर कोणताच नेता महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच आवाज बनून लढताना दिसत नाही.
महाराष्ट्रातील नेते जाती जातीचे नेते बनून लढताना दिसत आहे.हीच पुरोगामी महाराष्ट्राला धोक्याची घंटा आहे.संपलेला इतिहास उकरून त्यातून विष पसरविण्याचे काम काही नपुंसक लोक करत आहेत. हीच महाराष्ट्राला लाजविणारी गोष्ट आहे.सध्या लोकांची गरज काय...यावर आवाज विधिमंडळात व रस्तावर घेऊन.... लढवय्ये नेते महाराष्ट्राच्या कुशीतून हद्दपार झाले आहेत.
खरंच आपण २१ व्या शतकात आहे ...की प्राचीन काळातील प्राणी आहे असे वाटू लागले आहे.
जनतेच्या मनातील प्रश्न घेऊन मैदानात कोणताही नेता व समाजसेवक उतरताना दिसत नाही.प्रत्येक जन स्वतः ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे.स्वतंत्र मिळवण्याची काळी अनेक स्वतंत्र सेनानी जनतेचे प्रश्न घेऊन सुळावर चढलेले आपण पाहिले आहे.आज प्रत्येक नेता जनतेला जाती धर्माच्या साखळीत अडकून राज करण्यास मुक्त होत आहे. नेत्यांची लफडी, पुराणातील भाकड कथा,थडगी असले प्रश्न निर्माण करून जनतेचा भ्रमनिरास करून जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम अत्यंत ताकदीने नेते मंडळी करीत आहे.जे प्रश्न भारतीय न्यायव्यवस्था करणार आहे...असले नको ते प्रश्न घेऊन भाकड प्राण्यांचे दूध काढण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे.
सध्या विरोधकाला जनतेचे प्रश्न न दिसता ....संपलेला इतिहास उकरून त्यात काही लोणी तूप खाता येईल का याकडे लक्ष देणे गरजेचे वाटू लागले आहे.सत्ताधारी लोकांना लोक कसे जाती धर्मात विभागले जातील. गरजचे वाटू लागले आहे.त्यामुळे जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन आंदोलन करणारी मूळ जमात उपटून काढण्यात सत्ताधारी व विरोधक यशस्वी होऊ लागले आहेत.त्याला आमचा चौथा स्तंभ साथ देत आहे....हे न उलगडणारे कोडे आहे.
सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योजकांचे प्रश्न, पाणी,वीज रस्ते, शिक्षण म्हणजे मानवी विकास निर्देशांक कसा उंचावत जाईल.... यासाठी आंदोलन करणारी जमात नष्ट करून आपला राज्यकारभार वाटून खाण्यात सध्याचे राजकीय लोक दंग आहेत.स्वत:ची महत्त्वाकांक्षी वृत्ती वाढीस लागून आम्ही म्हणजे सर्वकाही असे भासविण्याचा प्रयत्न करून राजकीय दंगल करून.... जनतेला दंगलीची धग लागून जनता कशी भस्मसात होऊन असा प्रयत्न करणारे कमी नाहीत.
महाराष्ट्रातील जनतेने शहाणे होईल पुढाऱ्यांच्या पोरांना तुम आगे चलो हम कपडे संभालेंगे म्हणण्याची वेळ आली. नको ते विषय घेऊन लोकांची गर्दी करून माथी भडकण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे.
जगातील लोक इतर ग्रहांवर तर आमच्या पिढ्या नको तो इतिहास उकरून स्वतः ला धग लाऊन स्वतः ला उध्वस्त करून घेत आहेत. इतिहास उकरून इतिहास सांगणाऱ्या लोकांना स्वतः च्या पोटच्या गोळ्यांना पुढे करून इतिहास सांगावा.....धग लागूनच घ्यायची नाही.....असा विचार करून.... लोकांना शिका संघटित व्हा व संघर्ष करा या तत्वांशी प्रामाणिक राहून....मगच संघर्ष केलेला बरा....... स्वतः ला काहीच माहिती नसताना हा म्हणतो म्हणून लढणारे खूप जन आहेत.त्यांनी लक्षात ठेवावे पेटता इंगूळ आपण आपल्या घरावर ठेवतो आहे.त्याची धग कधीतरी स्वतः लाच सहन करावी लागणार आहे.
श्री.आनंदा आलदर ✒️ 9765066247