मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये आतापर्यंत १६ लाख ८१ हजार ५३१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील आरोग्य, गृहनिर्माण व पाणीपुरवठा विभागाच्या फ्लॅगशिप योजनांचा सद्यस्थितीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित ( दादा) पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार (भाऊ) गोरे , पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री , पंकज भोयर, योगेश कदम, मेघना ताई बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते.