प्रश्न जीवन कसे जगण्याचा.....
माझा भारत देश लोकसंख्येच्या बाबत जगात प्रथम क्रमांकावर आहे.भारत जागतिक महासत्ता बघण्याची स्वप्ने रंगवत आहे.स्वप्ने रंगवणं खूप चांगले आहे.पण ती स्वप्ने पूर्ण करताना माझा देश मानवी हक्क पुर्ण करतो का..? यांच्या कडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.
महासत्तेची स्वप्ने पाहत असताना.. असुरक्षिततेची भावना निर्माण होणे... विकसित भारताला शरमेची बाब आहे.शेतकरी, उद्योजक, स्त्री, अल्पसंख्याक तसेच गोरगरीब लोकांना सुरक्षित असल्याचे समाधान मिळेल तेव्हाच माझा देश विकसित झाला असे म्हणता येईल.या व्यक्ती आजही जगण्यासाठी धडपड करीत आहे.हे धडपड ही यांना असुरक्षित वाटते... याच्या वेदना आजही... भारतीय म्हणून खूप होतात.
आज ही भारत स्वतः ला विश्व गुरू संबोधण्यात दंग असला तरी आज ही अनेक भारतीय लोक दोन वेळच्या अन्नासाठी बटीक होऊन जगत आहेत.निवाऱ्यांचा तर पत्ताच नाही.शिक्षण म्हणाल तर त्याचा थांगपत्तात नाही.एक वेळच्या शुध्द पाण्याचा घोट यांच्या नशीबी केव्हा येणार...चांगला कपडालत्ता घालण्याची त्याची इच्छाशक्ती कधी पूर्ण होणार.. त्यांना थाटामाटात जीवन जगू वाटत असेल ना..? पण जगण्याचाच प्रश्न मिटला नाही तर बाकी हौस पूर्ण कशी होणार....
आज ही भारतात बहुसंख्य लोक रस्त्यावर रात्र काढत आहेत.त्याच्या झोपड्या कधी नगरपालिका येऊन तोडून जातील याची शाश्वती नाही.ऊसतोड कामगारांची मुले..पाहा..त्यांच्या आईबापांना ही सोशल मिडिया वर चाललेल्या सुरक्षित भारतात राहणाऱ्या लोकांचा थाटमाट पाहून आपल्या ही मुलांची हौस कधी पूर्ण होणार म्हणून डोळे पाणावले जात असतील ना...? पण जगण्याच्या प्रश्नाच काय..याला उत्तर शोधून ही सापडत नाही..
भटकत फिरणाऱ्या अनेक जमाती आहेत... त्यांना तर कधीच सुरक्षित वाटत नाही...पै पै करून उभारलेला संसार काही समाज कंटक कधी उध्वस्त करतील सांगता येत नाही.अशा भटक्या लोकांना... माजलेल्या सुरक्षित भारतातील लोकांपासून सावध व सुरक्षित राहण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे... परंतु यांच्या बाजूने लढणारेच कोणी नसल्याने त्यांना..जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे...मग सुरक्षितता कोठून मिळणार.
आज काही कपाळ करंटे जातीचा व धर्म सुधारणेचा ठेका घेऊन.. स्वतः चे हात गंगेत धुवून विश्वनेते बनण्याचा प्रयत्न करीत आहे.. त्यातून विष निर्माण करून दोन धर्मात व जातीत तेढ निर्माण करून स्वतः मात्र योग्य व सुरक्षित भारतात राहणाऱ्या प्रयत्न करीत आहे.
आज अनेकांना जगण्याचा प्रश्न असताना यांना वेगळेच शाहणपण सुचत आहे. असुरक्षित भारतातील लोकांनी शांत राहून आपला आपला काम धंदा, शिक्षण व जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी वर फोकस करून सुरक्षित भारतात जाऊन... आपल्या असुरक्षित बांधवांना सुरक्षित भारतात नेण्यासाठी प्रयत्न करावे.
पण पहिला जगण्याचा प्रश्न मिटवला तर...? हो जगण्याचा प्रश्न मिटवला तर......
प्रा.आनंदा आलदर - 9765066247