मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित वैद्य यांनी नुकतेच बोरिवली पूर्व येथील अभिनव विद्या मंदिर शाळेला स्वखर्चाने तीन ब्लॅक बोर्ड देऊन सहकार्य केले.या शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी हे वंचित गरीब कुटुंबातील असून अभ्यासात हुशार आहेत आणि संजय गांधी नॅशनल पार्क येथील आदिवासी पाड्यांमधून शिकायला येतात.
शाळेतील शिक्षिका तेजस्वी निवाते आणि पत्रकार गणेश हिरवे यांनी पुढाकार घेऊन सदर मदत अजित यांचेकडून मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. नवीन बोर्ड पाहून विद्यार्थी आनंदित तर झालेच पण नवीन फळ्यावर शिकवायला मिळणार म्हणून शिक्षकही खुश होते.शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची वालकर यांनी वैद्य यांचे आभार मानले आहेत.