भारतीय संविधान बद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस..
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकांकडून निवडला जातो.भारतातील प्रमुख शासन व्यवस्थेतील पदे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या लोकांकडून निवडले जातात.
विशेष सर्व शासकीय कार्यालयातील पदे सर्वसामान्यांसाठी खुली असतात.हेच भारतीय प्रजासत्ताकाचे वैशिष्ट्ये आहे.
76 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना प्रत्येक भारतीयांनी आपला हक्क व अधिकार माहीत करून घेणे काळाची गरज आहे.सामान्य व्यक्ती सुध्दा पंतप्रधान, राष्ट्रपती व कोणत्या ही शासकीय व प्रशासकीय पदावर विराजमान होऊ शकतो.हेच मजबूत प्रजासत्ताक दिनाचे गमक आहे.
स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतीय राज्यव्यवस्था स्थापन व्हावी यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली.संविधान सभेने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीयांनी स्विकारले. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान संपूर्ण देशभरात अंमलात आणले गेले.
*देशातील लोकशाही विजयाचा दिवस म्हणून प्रत्येक भारतीयांनी हा सण साजरा करणे गरजेचे आहे.*
याच दिवसापासून राजाच्या पोरगा राजा न बनता ... सर्वसामान्य घरातील मुले सुद्धा भारताचे शासन व प्रशासन चालवू शकतात.असे संविधान तयार झाले.
*असा दिवस सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत ज्यांनी घेतली त्यांचे आभार व्यक्त करण्याचा दिवस....*
भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व मसुदा समितीचे अध्यक्ष व भारतीय संविधानाचे शिल्पकार *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या मार्गदर्शनाखाली *राष्ट्रीय ग्रंथ* तयार करण्यात आला. संपूर्ण संविधान निर्मितीसाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले.
हे संविधान तयार करणाऱ्या लोकांना स्मरण करण्याचा हाच तो दिवस आहे.सामान्यांना असामान्य बनण्याचा हा तो दिवस आहे.हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे.प्रत्येक भारतीयांनी या सणांमध्ये सहभागी होऊन... राष्ट्रीय ग्रंथाचे वाचन करून आपले हक्क व अधिकार काय असतात...हे समजून घेऊन...मी ही भारतीय राज्यव्यवस्था चालवू शकतो ही भिष्म प्रतिज्ञा घेऊन हक्क व अधिकारासाठी लढले पाहिजे.
प्रत्येक भारतीयांनी अभिमानाने व स्वाभिमानाने जगायचे असेल तर आपला राष्ट्रीय ग्रंथ वाचलाच पाहिजे.मूलभूत हक्क व कर्तव्ये समजून घेऊन आपली मातृभूमीची भक्ती करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तींनी पुढे येणे काळाची गरज आहे.
समानतेचा,स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धार्मिक स्वातंत्र्याचा,सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, मालमत्तेचा अधिकार आणि घटनात्मक उपायांचा अधिकार संपूर्ण देशात हे अधिकार...76 वर्षांनंतर मिळाले आहेत का हे जाणून घेण्याचा हाच तो दिवस...
प्रा.आनंदा आलदर ✒️🌱🌱
9765066247