पंढरी नगरीतील राधामाईंचा आध्यात्मिक आणि सांगितिक सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल होणार सन्मान
डॉ.कल्याणीताई नामजोशी आणि डॉ ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांची उपस्थिती
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आध्यात्मिक आणि सांगितिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव सौ.शुभांगीताई (राधामाई) मनमाडकर.लहानपणापासूनच माहेरी वारकरी संप्रदाय वातावरण होते आपोआपच भजनाची आवड होतीच पुढे वारकरी सांप्रदायाचे पाईक दादा महाराज मनमाडकर यांच्या त्या स्नृषा शुभांगीताई या परिवारात सासरी आल्यापासून त्या पंढरपूर मध्ये रमल्या पं.तात्यासाहेब मंगळवेढेकर शोभना उत्पात.लिमकर गुरुजी.अश्विनी वळसंगकर यांचेकडे त्यांनी गायनकलेचे शास्त्र शुध्द शिक्षण घेत १९९४ साली संगीत विशारद पूर्ण करून सांगितिक सांस्कृतिक क्षेत्रातील गायनाची भजनाची परंपरा अनेक वर्षे पंढरपूर आणि पंचक्रोशीत गाजवली.आणि जोपासली त्या माध्यमातून पंढरपूर मधील चार महिलांची भजनी मंडळे तयार करून त्यांना भजन शिकवत भजनाची गोडी आजतागायत सुरू ठेवलेली आहे.
तसेच संस्कारभारती या संस्थेच्या माध्यमातून १९९८ पासून चार वर्षे या संस्थेचे अध्यक्ष पद भुषविले आणि त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रांत सरचिटणीस पदीही निवड झाली होती.त्या माध्यमातून अनेक कलांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केला.पंढरपूर मधील १०० वर्षांपूर्वी चे नगर वाचनालयचे १२ वर्ष संचालक पदही भुषविले तसेच त्यांचे पती श्री भगवान भाऊ मनमाडकर यांचे साऊंड सिस्टीम आणि मंडपाचा व्यवसाय त्या व्यवसायाला ५१ वर्ष जवळपास पूर्ण झाली आणि याच माध्यमातून पंढरपूर नगरीतील स्वरसाधना या संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सवात अतिशय सुंदर ध्वनी व्यवस्था केली आणि त्यातून संगीताची आवड अधिक निर्माण होत त्यांच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मनमाडकर परिवाराचे योगदान अनमोल आहे.याचबरोबर १९९८ साली ओम गुरुदेव आत्मामालिक ध्यानपीठ कोकणठाण या संस्थेशी जोडल्या गेल्या आणि तेव्हापासून पंढरपूर येथे स्वतःच्या घरी ध्यानपीठ शाखा सुरू करुन पंढरपूर मधील महिलांना आणि पुरुषांना ध्यानाचे महत्त्व पटवून त्यांच्याकडून ओंकार साधना करवून घेऊन त्यांच्या जीवनात आत्मसुखाची फुंकर घालत ते काम आजतागायत यशस्वी पध्दतीने चालू आहे.हे करीत असतानाच पती भगवानभाऊ मनमाडकर यांना काही वर्षांपूर्वी ह्रदय शस्त्रक्रिया करावी लागली या मोठ्या संकटातून भाऊंना सही सलामत बाहेर काढत सर्व परीवाराला ध्यानाच्या जोरावर खंबीरपणे पाठीशी उभ्या राहत आधार राधामाईंनी दिला.आपल्या मुलांवर तितकेच संस्कार करत आपला हा वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे कायम चालू रहावी यासाठी ह.भ.प.निरंजन महाराज मनमाडकर यांच्या श्रीमत् देवी भागवत आणि यज्ञयागादी माध्यमातून ही परंपरा पुढे नेटानं चालवण्याची काम करत आहेत.तसेच कन्या आरतीला भरतनाट्यम विशारद पूर्ण करून एम.एस.सी.बी.एड शिक्षण पूर्ण करत एका चांगल्या संस्थेत शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे काम करीत आहे.तसेच धनंजय भैय्या मनमाडकर आणि पल्लवी मनमाडकर याची त्यांना अनमोल साथ मिळत आहे.अशा या शुभांगीताई (राधामाईंचा) मनमाडकर यांचा प्रवासाला २२ जानेवारी रोजी ६१वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांच्या करत असलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील ख्यातनाम संत साहित्य अभ्यासक डॉ.कल्याणीताई नामजोशी यांचे शुभहस्ते आणि वारकरी संप्रदायाचे महामेरू असलेले गुरुवर्य डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
या सर्वांचे अनमोल विचार ऐकायला मिळणार असून या अभिष्टचिंतन सोहळ्या नंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका इंडियन आयडॉल विजेती ज्ञानेश्वरी गाडगे मुंबई हिच्या अभंग भक्तीगीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यांना सुंदर साथसंगत हार्मोनियम कार्तिकी गाडगे तबला हरी भगुरे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ गणेश गाडगे यांची असणार आहे आणि त्यानंतर उपस्थित सर्व मनमाडकर परिवारावर प्रेम करणाऱ्या उपस्थित सर्वांना स्नेहभोजानचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राधामाई सत्कार समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे.
हा अभिष्टचिंतन सोहळा यशस्वी करण्यासाठी भगवान भाऊ मनमाडकर धनंजय भैय्या मनमाडकर आरतीताई मनमाडकर पल्लवी मनमाडकर ज्ञानेश्वर दुधाणे संकेत कुलकर्णी वैभव केंगार तुकाराम आदीजण अधिक परिश्रम घेत आहेत.