पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्राहक चळवळीची समाजासाठी गरज असुन त्यामध्ये सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ऍड.सुनिल वाळुजकर यांनी केले ते राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक प्रबोधन पंधरवड्याचा शुभारंभ करताना बोलत होते. अध्यक्ष स्थानी ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते ग्राहक पंचायतीचे आराध्यदैवत स्वामी विवेकानंद व अ.भा.ग्राहक पंचायतीचे संस्थापक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, पंढरपूर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी ग्राहक प्रबोधन पंधरवड्याची सविस्तर माहिती दिली व ग्राहक संरक्षण कायद्याचा उद्देश स्पष्ट केला.जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची व त्याची अंमलबजावणी कशी करावी याबद्दल विस्तृत माहिती दिली.
प्रमुख अतिथी उपमुख्याधिकारी ऍड सुनिल वाळुजकर यांनी ग्राहक पंचायतीचे कार्याबद्दल व यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रशंसा केली. ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्यामुळे ग्राहकांना आपल्यावरील अन्याय, समस्या दूर करण्यासाठी मोठे साधन मिळाले असून अनुचित व्यापार करणाऱ्यांवर धाक निर्माण झाला आहे असे सांगितले.
या समारंभासाठी ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते, सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर, तालुका सहसंघटक आझाद अल्लापूरकर, तालुका सदस्य सागर शिंदे, रामदास डोंगरे, नरेंद्र कवडे,अंकुश वाघमारे,सचिन कोळेकर, सतिश निपाणकर,व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुका सचिव प्रा.धनंजय पंधे यांनी सूत्रसंचालन केले.