पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्राहकांनी जागृत होणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या पाठीशी ग्राहक संरक्षण कायदा आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी केले. ते ग्राहक प्रबोधन पंधरवड्यानिमित्त आयोजित विभागीय महावितरण कार्यालयातील कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी महावितरण पंढरपूर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ देवकर होते. प्रारंभी महावितरणचे आनंदकुमार गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले,त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे आराध्यदैवत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविकामध्ये तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी ग्राहक चळवळीबद्दल माहिती दिली.
अ. भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती देवुन ग्राहकांनी जागृत राहून आपल्या समस्या,अडचणींची सोडवणूक केली पाहिजे त्यासाठी तीन स्तरावरील यंत्रणेची उपलब्ध आहे. ग्राहक पंचायत,ग्राहक संरक्षण परिषद,ग्राहक तक्रार निवारण आयोग याबाबत विस्तृत माहिती देऊन ग्राहकांनी अन्याय दूर करण्यासाठी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या समारंभासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मध्यस्थता कक्षाचे सदस्य संभाजीराव लंगोटे, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर,तालुका सदस्य सागर शिंदे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.