बहुजन समाज तेव्हाच बलदंड होईल...
आज प्रत्येक क्षेत्रात बहुजन व गोरगरीब लोकांना Use And Throw सारखा वापर करून घेतला जात आहे.त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे.
आज बहुजन समाज अंधश्रद्धेमध्ये गुंतुन गेला आहे.मग अशा लोकांना गुलाम करणे सहज सोपे होऊन जाते.अंधश्रध्येच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा बहुजन बांधव करताना पाहताना मनाला खुप वेदना होतात.असे किती दिवस अंधश्रद्धा व गुलामगिरीत राहणार आहोत.
आरक्षण नावाचे एक कोलीत गरीब व बहुजनांचे राजकीय हत्यार करून त्यांना येटवान दाखविण्याचे काम चालू आहे.
माझ्या गोरगरीब व बहुजन बांधवांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे.चार दिवस उपाशी पोटी घरात झोपलो तरी आपल्याला काही होणार नाही.पण आपली मुले उच्च दर्जाच्या शिक्षणापासून दूर ठेवली तर... अजून आपल्या किती पिढ्या झोपेच्या आहारी जाऊन....किड्यामुग्यासारखे मरून जाणार आहेत ..काही माहित नाही...,! दिंड्या,पताके, काट्या,भंडारा व खोबरे आपण उधळायचे...पण लोण्यावर ताव मारणारे वेगळेच पाहायला मिळत आहे.
त्यामुळे अंधश्रद्धेतून बाहेर पडून शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.या प्रमाणे बहुजनांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता चांगल्या शिक्षणासाठी आपल्या पोटच्या मुलाबाळांवर खर्च करण्यावर भर द्यावा.भविष्यात आपली...... खुप मोठी एफडी असेल.
अनेक लोक धार्मिक चळवळीसाठी करोडोंचा खर्च करतात...पण त्याच धर्मातील लोक शहाणे... करण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही.त्याच खोटे पणा करून शिक्षणाचा दर्जा कमी करण्याचा प्रयत्न मात्र करतात.तेव्हा तो धर्म संकटात येत नाही का...? धार्मिक चळवळीपेक्षा जेव्हा माझ्या देशात शैक्षणिक चळवळ उभारली जाईल... तेव्हाच आम्हा भारतीयांना आम्ही सेफ आहोत असे वाटले.
आज लाडकी बहिण योजनेमुळे खुप काही उलथापालथ झाली.तशीच लाडकी लेक व लाडका ल्योक ही योजना आणून... पहिलीपासून लाडक्या लेकीला व ल्योकाला शिक्षणासाठी महिना ५००० रूपये स्टायफंड देण्याचे धारिष्ट्य आमचा देवा भाऊ, अजित दादा... लाडक्या बहिणींच्या भाऊरायाने दाखवावे. अशा योजनांचे लॉन्चिंग खुप मोठ्या जाहिराती करून करावे. ना कभी बटेंगे, ना कभी कटेंगे।
प्रा.आनंदा आलदर
9765066247✒️