जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी भालचंद्र अंबूरे यांना दिल्यामुळे जोगेश्वरीकरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे व्हिजन जोगेश्वरीत राबवून जोगेश्वरीचा कायापालट करणार आहे. मागील काही दिवसापासून प्रचारफेरी, डोअर टू डोअर प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वच परिसरात ठिकठिकाणी डोअर टू डोअर प्रचारादरम्यान स्थानिक महिलांकडून भालचंद्र अंबुरे यांचे जागोजागी स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी अनेक ठिकाणी महिलांनी औक्षणही केले.मला एक संधी दिली, तर नक्कीच जोगेश्वरीकरांचे महत्वाचे प्रश्न तत्काळ मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मतदारांना यावेळी दिले.जोगेश्वरीतील संजय गांधी नगर, भटवाडी, शंकरवाडी, ओमकारेश्वर मंदिर परिसर, आरे कॉलनी युनिट नं. ६ आणि ५, वाणीचा पाडा, प्रताप नगर, मेघवाडी, शाम नगर, आदर्श नगर, शिव टेकडी परिसर, गांधी नगर, बांद्रेकर वाडी, ईदगा मैदान, झुला मुस्लिम बहुल भाग अशा विविध भागात स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जोगेश्वरीतील महत्वाचे अरुंद रस्ते, घरांचा प्रश्न, प्रलंबित पुनर्विकास प्रकल्प, आरोग्य सेवेचा अभाव, अग्निशमन यंत्रणा, पी.एम.जी.पी कॉलनीचा रखडलेला पुनर्विकास अशा मूलभूत प्रश्नावर भर देणार असल्याचे अंबुरे यांनी सांगितले. काही जण राजकीय स्वार्थासाठी विकासाच्या अनेक संधींना अडथळा निर्माण केला जातो, आता जोगेश्वरीतील समस्यांवर ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे मत अंबुरे यांनी जनतेसमोर व्यक्त केले.