नांदेड प्रतिनिधी तेज न्युज
लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळविला त्यामागे जनोपयोगी योजनांचा प्रभाव होता, हे मान्य करतानाच महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा असून २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारान सोबत केलेल्या चर्चेदरम्यान केला.
दरम्यान, गेल्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण बहुमताचे लक्ष्य निश्चित केले होते तथापि, संविधान बदलण्याच्या मुद्द्यामुळे त्यांचे नुकसान झाले. विशेषत: दुर्बळ घटकाने अल्पसंख्याकांबाबत मोदींचा दृष्टिकोनच नाकारला. निकालानंतर बहुमत न मिळाल्याने मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागले. महाराष्ट्रातही विरोधकांनी सर्वाधिक जागा जिंकल्या हे मोदी आणि त्यांच्या धोरणांवर जनता नाराज असल्याचे द्याोतक असून हीच सध्याच्या विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याचे पवार म्हणाले.
जनतेला बदल हवा आहेच आणि हीच भावना कायम राहिली तर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. दुसरे आघाडीतील आमचा पक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २८८ जागांपैकी १०-११ जागा वगळता समन्वयाने काम करीत आहेत, असे पवार म्हणाले.