सांगोला विधानसभा निवडणूक प्रचारार्थ भाळवणी येथे सभा
भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्याला राजकारणाची एक दिशा होती. विधानसभा पुनर्रचनेत पंढरपूर तालुका विस्कळीत झाला अन् भाळवणी गट सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये समविष्ट करण्यात आला. परंतु गेल्या ३० वर्षाच्या कार्यकाळामध्ये सत्ताधारी आमदारांनी या गटाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक विकासाची कामे रखडलेली दिसून येतात. सांगोला तालुक्यामध्ये पैं पाहुण्याचे राजकारण जास्त चालते. पण मी कधीही विकासकामात राजकरण केले नसून माझ्याकडे आलेल्या कार्यकर्त्याला रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. माणुसकी माझी जात आणि कष्टकरी , उपेक्षकांना न्याय हेच माझे काम असल्याचे प्रतिपादन सांगोला विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महविकास आघडीचे उमेदवार दिपक साळुंखे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील गार्डी, लोणारवाडी, तिसंगी, सोनके, पळशी, उपरी, भंडीशेगाव, खेड भाळवणी, शेळवे, जैनवाडी, धोंडेवाडी, केसकरवाडी, शेंडगेवाडी येथे गावभेट दौरा आयोजित करण्यत आला होता. त्या निमित्ताने भाळवणी येथील शिवतीर्थावर दिपकआबा साळुंखे यांची प्रचार सभा संपन्न झाली.
पुढे बोलताना साळुंखे पाटील म्हणाले की, गेल्या 40 वर्षांमध्ये पक्ष जो आदेश देईल तो मान्य करून 35 वर्षे स्व. गणपतराव देशमुख व गेली 5 वर्षे शहाजीबापु पाटील यांना निवडणुकीत मदत केली. त्यांना विजयीही केले. परंतु 2024 च्या निवडणुकीत मला मदत करायला दोन्हीही उमेदवारांनी नकार दिला. शेवटी मी जनतेच्या दरबारी न्याय मागायचे ठरविले अन् जनता माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिले आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेलती आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असे सांगून पुढच्या काळात रस्ते, पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावून तरुण बेरोजगार राहणार नाही याची काळजी घेवून तालुक्यामध्ये एम.आय. डी.सी. आणणे हा माझा अजिंठा असेल.
सांगोला काँग्रेसचे नेते झपके सर, भाजपा पक्ष राज्यात राजकारणाची पूर्णपणे खालची पातळी गाटली आहे. शिंदे गटाने केलेले बंड राज्यातील मतदारांना रुचले नाही. त्याचा रोष मतदारांनी लोकसभेत आपण पहिला. स्व. गणपतराव देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत जो विक्रम केला आहे त्यामध्ये दिपक आबांचा सिंहाचा वाटा आहे. बापूंनीसुद्धा जो विजयाचा गुलाल उधाळला तो सुद्धा दीपक आबांच्या सहकार्यामुळेच उधळला. त्यामुळे दोघांनीही दीपक साळुंखे यांना सहकार्य करण्याचा नकार दिला. म्हणून दीपक आबांनी आत्ता जनतेच्या दरबारात जावून न्याय मागू अशी ठाम भूमिका घेवून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे मतदारांनी योग्य न्याय करून दीपक आबांना विजयी करण्याचे आवाहन केले.
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी, रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न मिटेल म्हणून आम्ही साथ दिली पण त्याची निराशा केली. भाळवणी गटातील शेतीच्या प्रश्न प्रलंबित आहे.. आणि विद्यमान आमदारांना पाणीदार आमदार म्हणून उपमा दिली जाते, ही एक शोकांतिका आहे. टक्केवारीची लागण या तालुक्याला लागली अन सर्वसामान्य लोकांचा विकास भकास झाला. भाळवणी गटातील विकासकामात जो अंधार निर्माण झाला आहे. येथील मतदार शिवसेनेची मशाल पेटवून अंधार दूर करतील अन् दीपक आबांना मतदान करून विजयाची मुहूर्तमेढ रोवतील, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रचार सभेप्रासंगी सांगोला नगरीचे नगरसवेक शिवाजी बनकर, शिवसेना तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश देठे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक इ बा. मुलाणी, मधुकर बनसोडे, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रवीण शिंदे, लुकमान इनामदार, महेश इंगोले, ग्रा. पं. सदस्य पोपट इंगोले, जयसिंग पवार, नागेश पाटील, हरिभाऊ लिंगे, नितीन खाडे, राष्ट्रवादी शरद पवार महिला आघाडी गटाच्या तालुका अध्यक्षा राजश्री ताड आदी महाविका स आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक भीमराव जाधव यांनी केले.