सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
पावसाळ्यातील उगवणाऱ्या छत्र्या प्रमाणे असंख्य झालेल्या पत्रकार संघटना त्यात पत्रकारांमधील जीवघेणी स्पर्धा तू मोठा की मी मोठा? अशी तकलादू अर्थहीन दिशाहीन टाकून दिलेली बुरसटलेली मानसिकता त्याच बरोबर पत्रकारांमध्ये असलेली दुफळी मुळेच हल्ली प्रामाणिक पत्रकारांवर खंडणी व तडीपारी सारखे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत याची ना कुणाला पर्वा न कुणाला खंत पत्रकारांवर दाखल झालेल्या खंडणी तडीपारीच्या बाबतीत कोणत्याही पत्रकार संघटना ला देणं घेणं राहिलेले दिसत नाही जोतो आपण भला व आपली पत्रकारिता भली याच विचाराने पत्रकारिता करत आहे.
जरा विचार करा पत्रकार मित्रानो आज ज्यांच्यावर ही वेळ आली आहे उद्या तुमच्यावर देखील कदाचित अशीच वेळ येणार आहे तुमच्यावर पण खंडणी तडीपारी सारखे गंभीर गुन्हे दाखल होणार आहेत त्यावेळी तुमच्या मनात काय विचार येत असतील ? नुसती कल्पना करा बातमी लावण्यावरून खंडणी तडीपारी सारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही बातमी लावण्यावरून तडीपार म्हणजे गाव बंदी जिल्हा बंदी आता सांगा इतर जिल्ह्यात जाऊन पत्रकारांनी भीक मागून जगायचं का? उभं आयुष्य पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून उभं आयुष्य सर्वसामान्य माणसांच्या त्याचबरोबर अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आपल्या वृत्तपत्रातून /पोर्टल /युट्युब च्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज काढत समाजाचा आरसा समजून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या पत्रकारांवर खंडणी तडीपारी सारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारांनी न्याय तरी कोणाला मागायचा?
तडीपारी सारख्या गुन्ह्यात आपल्या कुटूंबापासून दूर राहून पत्रकारिता का करायची? असा ही गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे हल्ली पत्रकारिता खूप जोखमीची झाली असून बातमी लावण्यावरून गंभीर गुन्हे दाखल होणे ही बाब अतिशय खेदजनक व वेदनादायी आहे कोरोना सारख्या जीवघेण्या महामारी मध्ये पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबाची पर्वा न करता केवळ राष्ट्रीय कर्तव्य समजून इमानईतबारे प्रामाणिक पत्रकारिता केली याचा प्रशासन ला विसर पडलेला दिसतोय आज पत्रकार अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत पत्रकारांची अवस्था बिकट व दयनीय झालेली आहे उभं आयुष्य समाजाच्या विकासासाठी भल्यासाठी खर्ची घालणाऱ्या पत्रकारांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली वयोवृद्ध व आजारपणात पत्रकारांना औषधाचा खर्च देखील भागवता येत नाही.
अश्यात बातमी लावण्यावरून खंडणी तडीपारी सारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर ही बाब निश्चित पत्रकारांना विचार मंथन करायला भाग पाडणारी आहे पत्रकारांची एकी नसल्याने व दुफळी असल्यानेच खंडणी तडीपारी सारखे गंभीर गुन्हे दाखल होतात हे मात्र नक्कीच.
यशवंत पवार
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र