पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकरी वर्गाच्या अनेक अडचणी असून या अडचणी सोडविण्यासाठी शेतकरी जोपर्यंत पेटवून उठत नाही. तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. असे प्रतिपादन जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्याच्या बिला संदर्भात साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे लेखी निवेदनासह यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचा पंढरपूर तालुक्यातील भोसे, करकंब,रोपळे परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते.
पुढे बोलताना देशमुख यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः सहभागी झाले पाहिजे. तरच त्या आंदोलनामध्ये धग निर्माण होऊन तातडीने दखल घेतली जाते. जनहित शेतकरी संघटना कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी जनहितचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत निकम, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन जमदाडे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर गायकवाड, महादेव गायकवाड, यावेळी कोळेगावचे सरपंच प्रसाद दुपडे, धनाजी सावंत, युवा जिल्हाध्यक्ष नाना मोरे, जिल्हा उपाध्यक्ष निसार पाटील, जनहित विमुक्तचे बिरू वाघमोडे , तानाजी मोठे, पिंटू पवार, हरिभाऊ लोंढे, मारुती भांगे, महादेव कसबे, बारीकराव काळे, प्रवीण काटे, पिंटू जगताप आदींसह शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.