कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद गावातील घटना
कोरेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
गावामध्ये खूप लाजिरवाणी गोष्ट झाली आहे .एवढ्या खालच्या थराला जाऊन माणसे काही करतील असं वाटलं नव्हतं.अशी अपेक्षा शेतकरी किरण जगताप यांनी तेज न्यूजला सांगितले आहे.
खरोखर गावचं नाव बदनाम करण्याची मनोवृत्ती दिसत आहे. माणुसकीला काळिंबा फासणारी गोष्ट आपल्या गावामध्ये झाली आहे. किरण शिवाजी जगताप यांच्या अर्धा एकर शेतामध्ये अज्ञात व्यक्तीने चक्क वाटाणा पिकावर तणनाशक फवारून मल्चिंग वर असणाऱ्या पिकाचे नुकसान केले आहे.
अशा विचारांच्या लोकांचा खरोखरच समाजाला धोका आहे.शेतकऱ्यांचं या हंगामातील पिकावरच वर्षाचं नियोजन ठरलेलं असतं.
एवढा मोठा खर्च करून निसर्ग वाऱ्यावरच शेतकऱ्यांना धरत असतानाच त्यातून वाचणारे पिकांवर सुद्धा काही समाजकंटक व्यक्तीदोषा वरून अशा पद्धतीची कृती करतातही. खरंतर लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा मनोवृत्तीच्या व्यक्तींचा मी निषेध करतो. अशा विचारांच्या लोकांना कोणीच पाठीशी घालू नये ही विनंती. अशा विचारांच्या लोकांना वेळीच शासन झालं पाहिजे.