पालक आणि शिक्षकांमध्ये संवाद महत्वाचा- डाॅ. स्वानंद कुलकर्णी
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालयात अनेक विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असतात. अशा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतना स्वतःची काळजी घेणे, आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हिच पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पालकांनी देखील आपल्या पाल्याच्या बाबतीत सजग राहायला हवे. यासाठी सातत्याने पालकांनी महाविद्यालयातील शिक्षकांच्या संपर्कात असणे आवश्यक असते असे मत उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी पालक मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
या पालक मेळाव्याची सुरवात उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. शिवशंकर, विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे, प्रा. अंजली चांदणे, पालक प्रतिनिधी नरहर कुलकर्णी आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते पालक प्रतिनिधी नरहर कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे यांनी विभागातील शैक्षणिक आलेख उपस्थित पालकांसमोर सादर केला. उपस्थित पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उप-प्राचार्य डॉ. स्विचेस कुलकर्णी यांनी उत्तरे दिली. दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. स्वप्ना गोड, प्रा. सोनाली घोडके, तृप्ती कदम, वंदना माळी, सत्यवान वसेकर, सूर्यकांत जाधव आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी श्रद्धा पंधे आणि अनघा कुलकर्णी यांनी केले.