स्वच्छता ही सेवा २०२४ ची संकल्पना ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’
सोनामाता आदर्श विद्यालयामध्ये स्वच्छता ही सेवा कार्यक्रम संपन्न
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
स्वच्छता ही चांगली सवय आहे, स्वच्छ पर्यावरण आणि आदर्श जीवनशैलीसाठी प्रत्येकाने ही सवय लावली पाहिजे.निरोगी शरीरात निरोगी मानसिकता विकसित होते, हे लक्षात घेऊन देशात स्वच्छतेची मोठी गरज पाहून आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छता ही सेवा सुरू केले, असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे केले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले केंद्रिय संचार ब्युरो आणि सोनामाता आदर्श विद्यालय यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२४ अभियानांतर्गत स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री चव्हाण बोलत होते.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक जिलामी पटेल, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, सुरेखा लादे, मिरा सुतार आणि सुजाता सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री चव्हाण पुढे म्हणाले स्वच्छता करणे हे केवळ आपल्या पंतप्रधानांचे काम नाही, तर समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी आपण या अभियानात खांद्याला खांदा लावून सहभागी झाले पाहिजे.याची सुरुवात घरे, शाळा, महाविद्यालये, समुदाय, कार्यालये, संस्था यापासून व्हायला हवी जेणेकरून देशात स्वच्छ भारत क्रांती मोठ्या प्रमाणावर होईल.
अंबादास यादव म्हणाले की, निरोगी व् सुदृढ़ आरोग्यासाठी विद्यार्थ्यानी स्वभाव आणि संस्कारामध्ये स्वच्छता गुण अंगीकार केले पाहिजे. प्रत्येकाने वर्षातून १०० तास श्रमदानातून स्वच्छता आणि पर्यावरणाची निगा राखली पाहिजे.
वैयक्तीक स्वच्छते सोबत स्वत:चे घर, आजूबाजूचा परिसर, शहर, उद्याने, पर्यावरण इत्यादी स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे असे श्री पटेल यांनी सांगितले.
सुजाता सुतार यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. एक झाड आईच्या नावे या उपक्रमांतर्गत केंद्रिय संचार ब्युरोचे परिसर आणि शाळेच्या परिसरामध्ये शेवगा, पारिजात, चाफा आणि तुळशीचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, सह शिक्षक गौरी खांडेकर, भीमराव माने, संतोष जाधव, दिपाली घोगले, अस्मिता अत्रे, राजश्री विंचूरकर, व्यंकटी घुगे, मोहन कांबळे, अनिल डोईफोडे, सॅमसन कंपाड, महादेव पवार, स्नेहा क्षिरसागर आणि स्मिता झळकी आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.