सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील माॅडेल पब्लिक स्कूलने आरटिई मध्ये मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याच्या पालक श्री यल्लप्पा निलप्पा मानकर यांच्याकडून सन 2013 पासून शिशु वर्ग ते ईयत्ता ८ वी तब्बल रु ९१०००/- फि तसेच रु २००००/- डोनेशन वसुल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, शासनाकडून आरटिईची परिपुर्ती आल्यावर भरलेली फि परत करु असे पालकांना शाळा मुखयाद्यापिका श्रीमती अदिती कुलकर्णी सांगत होत्या व फि वेळेवर न भरल्यास व उशीर झाल्यास विद्यार्थाला छापील अभ्यासक्रम, ओळखपत्र न देणे असे प्रकार करून मानसिक त्रास देऊन फी वसूल केली जायची, या जाचाला कंटाळून पालक श्री मानकर यांनी आपल्या पाल्याला त्या शाळेतून ईयत्ता ८ वी नंतर काढले व चुकिच्या पद्धतीने वसुल केलेली फि परत करण्याची मागणी केल्यावर शाळा मुखयाद्यापिका अदिती कुलकर्णी यांनी आरटिईची परिपुर्ती शासनाकडून आली नसल्याचे सांगितले तसेच संस्थेचे सचिव श्री अरूण जोशी यांनी फक्त रू १००००/- परत करण्याचे सांगितल्याचे कळवले, आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर पालक मानकर यांनी आपली व्यथा *महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांच्या कडे मांडली, दळवींनी शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांच्या कडे तक्रार दाखल केली व आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शुशीबेन शहा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली व आयोगाने शिक्षणाधिकारी सोलापूर, प्रशासन अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले तसेच शाळा मुखयाद्यापिकेला ७ दिवसात आपले लेखी म्हणणे सादर करणाचे आदेश दिलेत.
महासंघाची नितीन दळवी यांनी तक्रारी द्वारे मागणी आहे की या शाळा मुखयाद्यापिका व संस्था चालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे कारण शाळा प्रशासनाने शासनाची व पालकांची दोघांची फसवणूक केली आहे, या शाळेने असा प्रकार किती विद्यार्थ्यां बरोबर केला याची चौकशी झाली पाहिजे, या प्रकारात शासनाकडून आरटिई परिपुर्ती घेणे व पालकांकडून देखील फि वसुल करणे असे झाल्याची शक्यता निदर्शनास येते, म्हणून या शाळेला आजतागायत आरटिई परिपुर्ती कीती गेली, आरटिई प्रवेश किती झाले याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महासंघाचे दळवी यांनी केली आहे