पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अन्नदानाचे गाव म्हणून अवघ्या महाराष्ट्रामध्ये परिचित असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रोपळे विकास प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी वारीसाठी पंढरीकडे जाणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्यात आले.
रोपळे विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व कोल्हापूर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून त्यामुळे समाजातील अनेक गरजूंना दिलासा मिळत आहे. याच उपक्रमांपैकी एक म्हणजे वारीतील भाविकांना करण्यात येणारे अन्नदान. या अन्नदानाचे यंदाचे पाचवे वर्ष असून यंदाही कुर्डूवाडी पंढरपूर मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना मोठ्या भक्ती भावाने अन्नदान करण्यात आले.
यावेळी रोपळे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन भोसले,उपसरपंच विलास अ भोसले,रोपळे विकास प्रतिष्ठानचे संचालक हर्षवर्धन शहा,बालाजी भोसले,प्रदिप भोसले ,प्रसन्न जाधव,दिपक भोसले, युवा सेनेचे महादेव भोसले,तेजेश भोसले, रणजित भोसले,सतीश भोसले,चंद्रकांत कदम, संजय रितोंड,सुधीर भोसले,पोपट पाटोळे, रणजित चव्हाण,लखन जाधव,प्रमोद हडपे, मधुकर जाधव,गणेश चंदनवाले,मनोज चंदनवाले,विशाल चंदनवाले,परशुराम चंदनवाले,निखिल गायकवाड, मयूर गायकवाड यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमातून गरजूंना दिलासा दिल्याचे समाधान...
रोपळे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून गरजवंतांना दिलासा दिल्याचे समाधान मिळते. समाजासाठी सेवेची आणि मदतीची भूमिका अनेक वेळा शाश्वत विकासाला चालना देणारी ठरते. तर भाविकांना अन्नदान करण्याचा उपक्रम भाविक सेवेचा सामाजिक विचार आहे.
शिवाजीराव भोसले
अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय