सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मागील दोन वर्षांपासून दरवर्षी दिवाळी व गौरी गणपती तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून आनंदाचा शिधा वाटप होत आहे फक्त 100 रुपयामध्ये एक किलो तेल एक किलो साखर एक किलो रवा व एक किलो हरभरा अश्या वस्तू दिल्या जातात. शिधापत्रिका धारकांना या चार वस्तू फक्त 100 रुपयामध्ये मिळतं असल्याने या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील 1 लाख 25 हजार कुटुंबांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळतो. दिवाळी मध्ये सहा वस्तू दिल्या जातात तर इतर वेळी चार वस्तू दिल्या जातात प्रत्येक वस्तू चे एक किलोचे स्वतंत्र पॅकिंग व सोबत स्वतंत्र बॅग असे एक किट दिले जाते.
पुरवठादारांकडून माल आला की वाटप सुरु होईल सध्या तरी 15 ऑगस्ट ही तारीख वाटप करण्यासाठी निश्चित केली आहे त्यानंतर सर्वाना वाटप केले जाईल
ओंकार पडोळे ,अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर.