केंद्रीय बजेट वरील प्रतिक्रिया
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केंद्र सरकारने सादर केलेले बजेट हे लबाडाचे औतान आहे यामध्ये विशेष करून महाराष्ट्राला पूर्णपणे दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. सत्तेच्या लाचारीपोटी बिहार व आंध्र प्रदेशाकरिता विशेष झुकते माप देऊन देशाच्या संतुलित विकासामध्ये पक्षपाती पणा केला आहे. महाराष्ट्रातुन करोडो रुपये कराच्या माध्यमातून वसूल करून आत्तापर्यंत केंद्रांतील मोदी सरकारने महाराष्ट्र लुटण्याचे काम केले आहे.
महाराष्ट्रातील भाजप मित्र पक्षांच्या आठ खासदारांना तर कोठेही खीजगिनतीत सुद्धा घेतले नाही महाराष्ट्राला सापत्न वागणूक मोदी सरकार किती दिवस देणार आणि महाराष्ट्र हे किती दिवस सहन करणार? महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
केंद्रीय बजेट मधील तरतुदी अत्यंत तकलादू असून, त्या फसव्या आहेत व लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत, महिलांसाठी बेरोजगारांसाठी त्यात भरीव अशा कुठल्याही योजना तरतुदी या अर्थसंकल्पात नाहीत. अत्यंत निराशा जनक हा अर्थसंकल्प आहे.
अस्मिता गायकवाड
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष