मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबई येथे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल भाळवणी ग्रामपंचायतच्या वतीने आठवले यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी सरपंच रणजीत जाधव, सहकार शिरोमणी संचालक सुनील पाटील रिपाईचे तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले आदी उपस्थित होते.यावेळी भाळवणीतील विकास कामा बद्दल त्यांना निवेदन दिले.
यावेळी आठवले म्हणाले की , भाळवणी गावांनी मला खूप मोठे सहकार्य केले आहे.त्यामुळे माझ्या निधीतून गावाचा विकास करण्यासाठी फंड उपलब्ध करून दिला जाईल.तसेच केंद्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या योजना आपल्या गावापर्यंत पोहचवाव्यात असे हि आठवले म्हणाले.