फलटण प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्यातील एसटी बस व्यवस्थेवरील दुर्लक्षामुळे महाराष्ट्रातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण जगभरात आलेले कोरोनाचे संकट त्यामुळे सगळीकडे प्रवास बंदी. त्या काळात महाराष्ट्र शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही बसेस मालवाहतुकीसाठी वापरल्या. आता कोरोना संपून २ वर्षे झाली तरीही मालवाहतुकीसाठी वापरलेल्या बसेस अजूनही तशाच उभ्या आहेत. त्या बसेस तात्काळ पूर्ववत चालू कराव्यात जेणेकरून परत खेडे वस्तीवरील जनतेला प्रवास करणे शक्य व सुलभ होईल, काही ठिकाणच्या बसेस बंद केल्या आहेत त्या परत चालू होतील. जर ह्या बसेस महाराष्ट्र शासनाला चालू करणे शक्य नसल्यास नवीन बसेस खरेदी करून चालू कराव्यात अशी मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनात केली आहे.
वरील मान्यवरांना व जिल्हाधिकारी यांना विनंती की पुणे विभागीय आगार व्यवस्थापक व सातारा फलटण कोरेगाव इत्यादीत आगार व्यवस्थापक यांना आदेश करावेत की, त्या त्या आगाराकडे मालवाहतुकीसाठी वापरलेल्या बसेस तात्काळ दुरुस्त करून काही ठिकाणच्या कमी केलेल्या बसेस पूर्ववत चालू कराव्यात. जेणेकरून गाव-गड्यातील नागरिकांना प्रवास शक्य होईल तसेच नागरिकांचा त्रासही कमी होईल अशी मागणी फलटण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी सांगितले आहे.