पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विद्या वह ताकत है जो इंसान के सारे भ्रम तोड देती है. सर्वच महाविद्यालय विद्यालय हायस्कूल मराठी शाळा यांच्या परीक्षा संपून शालांत परीक्षेचे निकाल लागून सुट्ट्याही सुरू झाल्या.
जी मुले वरच्या वर्गात गेली आहेत उदाहरणार्थ चौथीतील मुले पाचवीला गेली आहेत पहिली तील दुसरीला गेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली जुनी पुस्तके कवडीमोल भावाने घालण्यापेक्षा शाळेला जाण देऊन एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल. याकरता आपण मागील वर्षीची पुस्तके रद्दीला न घालता शाळेमध्ये देऊन सहकार्य करावे त्यामुळे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वंचित असल्यास त्या पुस्तकाचा फायदा होऊन एक प्रकारचे मदत होणार आहे. असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे पत्रकार यांनी व्यक्त केले.
कर्मयोगी विद्यानिकेतन येथे या उपक्रमासाठी निकाला दिवशी पालकांना आपली पुस्तके शाळेला देऊन सहकार्य करा असे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद म्हणून कर्मवीर विद्यानिकेतन येथे चौथीच्या वर्गातून पाचवीच्या वर्गात गेलेल्या रुद्र अक्षय देशपांडे याची इयत्ता चौथीची सर्व विषयाची पुस्तके एखाद्या गरजूला उपयोगी येतील म्हणून रमय योगी विद्यानिक त्यांच्या प्राचार्य प्रियदर्शनी सरदेसाई यांना चौथीची पुस्तके सुपूर्द केली. कर्मयोगी विद्यानिक त्यांचे मार्गदर्शक माजी आमदार प्रशांत परिचारक या प्रशालेचे मार्गदर्शक रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यानिकेत्यांच्या प्राचार्य सरदेसाई मॅडम यांनी ही पुस्तके दानची कल्पना अंमलात आणली त्याला प्रतिसाद यात्रा मिळत आहे असे सरदेसाई मॅडम यांनी सांगितले. आपण शाळेला दान केलेल्या पुस्तकामुळे जी अनेक मुले गरजू आहेत परंतु त्यांना नवीन पुस्तके घेताना अडचणी येतात काहीजण बोलून दाखवतात काहीजण बोलून दाखवत नाही अशांकरता कर्मयोगी विद्यानिकेतनने ही कल्पना अवलंबिली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज शाळेकडे चौथी इयत्ता ची पुस्तके रुद्र देशपांडे यांचे आजोबा नंदकुमार देशपांडे यांनी प्राचार्य सरदेसाई यांच्याकडे सुपूर्द केली.
आपणही आपली पुस्तके ज्या ज्या शाळेकडे सुपूर्द करून विद्याधानासारख्या पवित्र कार्याला हातभार लावावा असेही त्यांनी सांगितले आपण शाळांना सुट्टी लागल्या की मुलगा मुलगी वरच्या वर्गात गेली की मागील वर्षाची पुस्तके आपण रद्दीमध्ये जमा करतो असे न करता ही पुस्तके शाळेकडे दान केल्यास कोणाला ना कोणाला उपयोगी पडू शकतात किमान प्रत्येक व्यक्तीने त्या त्या शाळेतील शिकत असलेल्या आपल्या पाल्याची पुस्तके शाळेकडे सुपूर्द करावी त्यामुळे शिक्षणाची उमेद असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी याची मदत होणार आहे. आपण मागील वर्षी हजार बाराशे रुपये किमतीची पुस्तके आपल्या पडलेल्या घेतली आहेत.
परंतु केवळ पाच 25 रुपये किलोच्या भावाने रद्दीत घालण्यापेक्षा आपण ही पुस्तके शाळेकडे सुपूर्द करावी जर आपण असे काही केले नाही तर आपण सुशिक्षित असूनही आपण समाजासाठी काहीही करू शकलो नाही असे छेदाने म्हणावे लागेल याकरता पालकांनी आपली पुस्तके त्या त्या शाळेकडे भेट म्हणून सुपूर्द करावीत असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा व तालुका यांच्या वतीने ही करण्यात येत आहे आपल्या एक अमूल्य भेटीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण संच मदत होणार आहे हे तेवढेच खरे आहे याकरता आपण शाळेकडे पुस्तके भेट म्हणून सुपूर्त करावी.