पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
धनकवडीत पालिकेने आंबेगाव पठार येथून आलेल्या ड्रेनेजच्या सर्व लाईन पावसाळी चेंबरला जोडल्या असल्या कारणाने मोहननगर , शिवशंकर चौक रोड , विद्यानगरी मित्र मंडळ , राजमुद्रा सोसायटी , स्फूर्ती सोसायटी , नवरंग सोसायटी , साईनाथ मित्र मंडळ चौक व राऊत बाग सोसायटी यालगतच्या सर्व नागरिकांना ड्रेनेजच्या खुल्या वाहत्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे व डासांचे प्रमाण खूप वाढल्या कारणाने नागरिक हैराण झाले आहेत.
आज पतित पावन संघटनेच्या मार्फत नागरिकांच्या तक्रारींसाठी मलनिस्सारण विभाग पालिकेतील अधिकारी व संबंधित धनकवडी क्षेत्रिय कार्यालय आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावर बजेट कमी असल्याने धनकवडी वाँर्ड ऑफिस कडून हे काम होणार नाही असेही आयुक्त साहेबांनी कळवले आहे, नागरिकांनी यामागेही कित्येकदा तक्रारी केलेल्या आहेत व पत्रव्यवहार सुद्धा झालेले आहेत तरी सुद्धा नागरिकांना वर्षानुवर्षे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यावर लवकर काम होणार नाही अशी बाब समोर येत आहे. याची तक्रार नोंदवण्यात आली असून लवकरात लवकर नागरिकांच्या अडचणी पालिकेने सोडवल्यानाहीत तर संतप्त नागरिकां समवेत पतित पावन संघटने मार्फत पुणे महानगर पालिकेत संबंधित अधिकारी यांच्या केबिन मध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येणार आहे.याची नोंद पालिका प्रशासनाने घ्यावी.