छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सहसंपर्कप्रमुख गणेश माने यांच्या वतीने निवेदन
माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांना पंढरपूर तहसील कार्यालया मार्फत निवेदन देण्यात आले सदर निवेदनात नमूद की, दिवसेंदिवस बोगस बियाणे विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बऱ्याच कंपन्याचे बियाणे हे बोगस असल्याने उगवत नाही.बोगस रासायनिक खतांमुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते व शेतकऱ्यांना मनस्ताप त्याच बरोबर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते.अशी परिस्थिती उद्भभवल्यानंतर जेव्हा कृषी कार्यालयाचे उंबरठे शेतकऱ्यांना झिजवावे लागतात तेव्हा कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही किंवा कृषी विभाग या बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाई देखील करत नाही. राज्यातील शेतकरी हा सतत नापिकी,निसर्गाच्या अवेळी बदलामुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे अशा नापिकी अस्मानी व सुलतानी संकटाना कंटाळून महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव म्हणाव लागेल.कृषी प्रधान म्हणून ओळख असलेल्या या राज्यात फक्त चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते याचा विचार राज्यकर्ते म्हणून राज्य शासन कधी करणार
मे महिना संपत आला असून मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांची पेरणी करण्याकरिता बि-बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. कृषी केंद्र विक्रेत्याकडून ज्यादा दराने बियाणे व खत विक्री सुरू आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याकडून जादा दर घेणे हा एकप्रकारे गुन्हा आहे.
माञ व्यापारीवर्ग जादा दराने खत आणि बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची लुट चालवलेली आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री,कृषिमंत्री यांनी स्वतः यात लक्ष घालून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करावी. अन्यथा मोठया जन आंदोलनाला सामारे जावे लागेल असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी उपस्थित प्रदेश सहसंपर्क प्रमुख गणेश माने प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग मोरे सोलापूर जिल्हा संघटक विजय साळुंखे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष संदीप झांबरे प्रदीप सुरवसे प्रज्वल तरटे पंडित जाधव आदी उपस्थित होते.