आरपीआयच्या कार्यकर्त्यांना भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रचारात सोबतीला घेत नसल्याने कार्यकर्ते तटस्थ राहिले आहेत.असे मत ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांनी व्यक्त केले आहे.
माळशिरस प्रतिनिधी
भाजप बरोबर आरपीआय आठवले गट युती आहे त्यामुळे आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना भाजपने स्टार प्रचारक म्हणून सोबत घेतलं आहे देशात चोवीस व महाराष्ट्रात पन्नास जाहीर सभा रामदास आठवले यांनी घेतल्या आहेत मात्र माढा लोकसभा मतदारसंघात भाजप आरपीआय शिवसेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माळशिरस तालुक्यातील आरपीआय कार्यकर्त्यांना भेटून चर्चा करत नाहीत तसेच माढा लोकसभा मतदारसंघात आरपीआयच्या कार्यकर्त्यांना प्रचारात कुठेही बोलवत नाहीत अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली आहे त्यामुळे अगोदरच भाजप घटक पक्षांवर आरपीआयचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत कारण आरपीआय आठवले गटाला शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन जागा सोडण्याची मागणी केली होती पण ती मान्य केली नाही परंतु राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप सोबत रहाण्याचे ठरवलं आहे त्यांनी कार्यकर्त्यांना भाजप घटक पक्ष युतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे कार्यकर्ते सहकार्य करण्याच्या तयारीत होते मात्र भाजप व त्यांचे उमेदवार वरिष्ठ नेते माळशिरस तालुक्यातील आरपीआय कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याने कार्यकर्ते तटस्थ राहिले आहेत उद्या निवडणुकीत निकाल वेगळा लागल्यास आरपीआय जबाबदार रहाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे