पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कासेगाव येथील सातवा मैल येथे डॉक्टर भीमराव पाटील यांच्या फार्म हाऊस वरती सालाबादप्रमाणे या ही वर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. मातोश्री चॅरिटेबल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. भीमराव पाटील हे वर्षभर सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात. हनुमान जयंती च्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात लाईफ लाईन हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे डॉ. निरंजन दोडके यांनी आधुनिक जगात संतुलित आहाराचे महत्त्व या विषयी मार्ग दर्शन केले. त्यांनी उपस्थित हनुमान भक्तांना आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा व कोणत्या प्रकारचा आहार घेऊ नये. याविषयी आपल्या अभ्यासपूर्ण भाषेत उपस्थितांना संबोधित केले.
डॉ. निरंजन दोडके पुढे म्हणाले की, प्रोटीन व्हिटॅमिन, मिनरल्स यांचे प्रमाण आपल्या शरीरात योग्य प्रमाणात असेल तर आपण कोणत्याही प्रकारच्या आजारास सहजासहजी बळी पडणार नाही. त्यामुळे आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात आहार आणि व्यायाम यांचे योग्य पद्धतीने नियोजन करणे हे महत्त्वाचे आहे. योग्य आहार व प्रमाणबद्ध व्यायाम हे स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्ता खिलारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. शशिकांत रणवरे, डॉ. सुनिता पाटील, सुनील जाधव, उमेश ढोबळे व सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ. संगीता पाटील यांनी मानले.