मुंबई प्रतिनिधी पूनम पाटगावे
गोरेगाव पूर्व आरे कॉलनी येथील वणीचा पाडा येथील मुलांसाठी नुकतेच श्री समर्थ विद्यालय जोगेश्वरी पूर्व आयोजित स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला.
मागील आठ दहा वर्षांपासून येथील साधारण दिडशे मुलांना शाळेच्या शिक्षकांच्या स्वखर्चाने बसने विद्यार्थ्याना वांद्रेकर वाडी येथील श्री समर्थ शाळेत शिकण्यासाठी आणले जात आहे.दहावी पास झाले तरी आजही या मुलांची नाळ शाळेशी जुळलेली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ वळंजू आणि इतर पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.शाळेचा माजी विद्यार्थी अजित भोगले यांचे तर्फे मुलांना पेन सेट भेट देण्यात आला.