पंढरपूर प्रतिनिधी
श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर शाळेत मतदान केंद्र आहे. या शाळेच्या केंद्रावर मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. आपल्या भारतीय लोकशाहीच्या उत्सवात कुटुंबातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांना पत्रलेखन करून ७ मे सोमवार रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ४ थी च्या बालमित्र चि. अर्णव, श्लोक,आरोही, संचिता व तेजस्विनी यांनी आपले पत्र वाचून माहिती दिली.
याप्रसंगी श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संस्थापिका सचिवा सुनेत्राताई पवार यांनी मुलांना व पालकांना म्हणाल्या "लोकशाही बळकट व समृद्ध करण्यासाठी आपले एक मत महत्त्वाचे आहे.आपले मतदान, हा आपला पवित्र हक्क आहे. तो बजावणे आणि भारताची लोकशाही जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे."
तसेच यावेळी मुलांना मतदान यंत्रा बद्दल व मतदान का करावे ? याबद्दल माहिती मुख्याध्यापक संतोष कवडे व टापरे सर यांनी मतदान यंत्रावर शेवटचे बटन कशाचे असते याबद्दल सखोल माहिती सांगितली. हा उपक्रम राबवण्यासाठी वर्गशिक्षक महेश भोसले यांनी परिश्रम घेतले.