शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी केली मुख्यमंत्र्याकडे मागणी
सोलापूर प्रतिनिधी नेताजी शिंदे
सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, परंतु सध्या उजनी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून उजनी धरणातून उजव्या व डाव्या कॅनलला १५ दिवसाची पाण्याची पाळी सोडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गाईगुरे व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.जर उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडल्यास दुष्काळी परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ७०% गावातील जनावराच्या पाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय होईल.याचसोबत मोहोळ तालुक्यातील येवती तलाव 90% भरलेले असून त्यामधून आष्टी टप्पा क्रमांक 2 चे ट्रायल घेऊन पेनूर, पाटकुल, खवणी, चिखली, पोखरापूर, सारोळे, या गावांना पिण्याच्या पाण्याकरता व जनावरांसाठी पाणी देण्यात यावे यासाठी तातडीची गंभीर बाब म्हणून पाणी सोडावे अशा मागणीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
आधी प्यायला पाणी द्या मग प्रचार करा
सर्वसामान्य जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे आणि राजकीय नेते फक्त प्रचारात दंग आहेत.राजकारण व प्रचार नंतर करा परंतु सर्वसामान्य जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवा. म्हणून एक मी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल द्वारे पत्र पाठवले आहे.उमेदवारांनी प्रचार दरात दंग होण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे पिण्याच्या पाण्याची शक्य ती सोय करावी.
- चरणराज चवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर