पंढरपूर प्रतिनिधी
तक्रार निवारण दिनातील ग्राहकांच्या तक्रारीवर प्राधान्याने निर्णय घेण्यात येतात त्यामुळे या उपक्रमाचा उपयोग करावा असे आवाहन कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले.
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी महावितरणतर्फे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे पंढरपूर येथील विभागीय कार्यालयात आयोजित तक्रार निवारण दिन उपक्रमात ते बोलत होते. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जितेंद्र कांबळे, ग्राहकांचे वतीने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा संघटक दीपक इरकल,सचिव सुहास निकते,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर,तालुका सचिव प्रा.धनंजय पंधे,उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सदस्य शहाजी जाधव, इ उपस्थित होते. वीज बिल दुरुस्ती,योग्य दाबाने वीजपुरवठा न होणे, अवाजवी बील,अंदाजे बील,सबसीडी न मिळणे, खराब मीटर बदलून मिळणे,खाजगी प्लाॅटमधील वीजेचा खांब काढणे,तुटलेल्या वीज वाहिन्या दुरुस्ती, फळझाडावरील वीज वाहिन्या हटविणे अशा अनेक स्वरुपाच्या तक्रारी घेऊन राजू रोकडे, कोलार सर,दशरथ मोहिते सर,शिवप्रसाद नगरकर,पंधे इ.ग्राहक उपस्थित होते.
यावेळी एसटी महामंडळाच्या चार्जिंग स्टेशनच्या कामाबद्दल व महावितरणतर्फे चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या मागणीबाबतही चर्चा झाली.