श्री स्वामी समर्थ प्रशाला,अरळी द.येथे "मराठी राजभाषा दिन" उत्साहात साजरा
मराठी भाषा समृध्द करायची असेल तर स्वत: पासुन सुरुवात करावी :—एस.के.स्वामी मुख्याध्यापक
अरळी प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ प्रशाला,अरळी द.येथे कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्म दिवस "मराठी राजभाषा दिन" म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले श्री मल्लिकार्जुन प्रशाला,बोरेगावचे मुख्याध्यापक श्री एस.के.स्वामी सर व श्री क्षेञ धोञी येथील भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक श्री स्वामीनाथ कलशेट्टी सरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध काव्यप्रकार म्हणजे अभंग,ओवी,पोवाडा,गवळण,कविता,चारौळ्या सादर केल्या तर काही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व विशद केले.
याप्रसंगी बोलताना श्री एस.के. स्वामी सर म्हणाले की मराठी भाषेमुळे आपण वैभवसंपन्न बनलो आहोत कारण मराठी भाषा ही अलंकाराने सजलेली आहे.ही भाषा वृत्ते,छंद,म्हणी,वाक्यप्रचार,
निसर्ग काव्याने व्यापली आहे.मराठीला राजभाषा करण्यासाठी,समृध्द करण्यासाठी स्वत:पासुन सुरुवात करावी असे आवाहन केले.तसेच इतिहास अभ्यासक ,व्याख्याते प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी सरांनी मराठी भाषेचा इतिहास सांगताना मराठी भाषेची वैभव संपन्नता स्पष्ट केले तसेच "सांगा कस जगायच,आई,कणा,बाप,निसर्ग कविता सादर करत उपस्थिताची वाहवा मिळविले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण तेलुणगी सर होते.
कार्यक्रमाचे सुञसंचलन नववी वर्गातील कु.सुहाना गामाजी व राजनंदिनी कलसुरे,प्रस्तावना आठवी वर्गातील कु. विशाखा निकम हिने केले तर उपस्थितांचे आभार मराठी विभाग प्रमुख श्री कोरे एम.एम.सरांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.रुपाली रामशेट्टी,संदिप स्वामी,पाटील सर यांनी विशष प्रयत्न केले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.