मुंबई प्रतिनिधी
मराठा समाजाचे सुप्रसिद्ध नेते मनोज पाटील जरांगे आणि शिंदे सरकार या दोन घटकांचे समन्वयक म्हणून रुग्णदुत मंगेश चिवटे यांची भूमिका पुन्हा एकदा सरस ठरली आहे.
कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मनोज पाटील जरांगे या दोन्ही जनांचा विश्वास मंगेश चिवटे यांच्यावर असल्याने मागील मराठा आंदोलन असो वा सध्याचे जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण असो. यात समेट घडविण्यात यश आलं आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे चिवटे यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा,धाडस,कायद्याचा सखोल अभ्यास,प्रशासकीय हातोटी अन् समेट घडविण्याचे कौशल्य या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांना जटिल प्रश्न सोडविण्यात नेहमी यश मिळालं आहे.
यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.अत: मंगेश चिवटे यांच्या या यशाबद्दल अभिनंदन एवं सकल मराठा समाजाच्यावतीने आभार अन् पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अशी माहिती ठाणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे भरत ज्ञानेश्वर गोपाळे यांनी तेज न्यूज ला दिली आहे.