पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील बंद असलेले व भाविकांचे, पर्यटकांचे आकर्षण केंद्र असणारे तुळशी वृंदावन ८ जानेवारी पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुले होणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने पाच वर्षापूर्वी निर्माण केलेले राज्यातील एकमेव असलेले पंढरपूर येथील तुळशी वृंदावन होय.त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध संताची मंदिरे, श्री विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या विविध प्रकारच्या तुळशींची लागवड, इतर विशिष्ट फुलझाडे, तसेच संताची भित्तिचित्रे, त्यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी माहिती, त्याचबरोबर कारंजे, म्युझिक लाईट, त्याच परिसरात असलेला यमाई तलाव अशा प्रकारे भाविकांना आनंद मिळण्यासाठी तेथे प्रयत्न केले आहेत.तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना पाहण्यासाठी हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले आहे.
मात्र त्यातील काही मंदिराची पडझड झाल्याने विकसित केलेले हे तुळशी वृंदावन मागील सात महिन्यापासून बंद होते. ते लवकर सुरू व्हावे याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वारंवार संबंधित वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता.आषाढी यात्रेसाठी, त्यानंतर अधिक मासा निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी, त्यानंतर कार्तिकी यात्रेसाठी तसेच नाताळ सुट्टी व वर्षाअखेरीस पंढरपूर येथे आयोजित केलेले दोन मोठ्या सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांना हे तुळशी वृंदावन पाहता येईल यासाठी ते लवकरात लवकर खुले करण्यात यावे म्हणूनही प्रयत्न केले.
अखेरीस या प्रयत्नांना यश येऊन तुळशी वृंदावन हे सर्वांसाठी ८ जानेवारी रोजी खुले होत असल्याचे वनविभागाने जाहीर केले आहे. याबद्दल वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना ग्राहक पंचायतीने धन्यवाद दिले आहेत.
जास्तीत जास्त पर्यटकांनी तुळशी वृंदावनास भेट द्यावी असे आवाहन
अ.भा.ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हा संघटक दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये,संघटक महेश भोसले,प्रा.धनंजय पंधे, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे अण्णा ऐतवाडकर यांनी केली आहे.