भाळवणी प्रतिनिधी
अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहावे याकरिता म्हणून आम्ही आयोध्या येथे गेलो होतो त्याचे आज सार्थक झाले.असे मत शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
श्रीराम मंदिरात श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजनासह कारसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी संभाजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संभाजी शिंदे,आनंद देशपांडे, धनंजय कापसे, चंद्रकांत शिंदे, शुक्राचार्य वाईकर हे कार सेवक म्हणून अयोध्या येथे गेले होते.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की ,आम्हाला त्यावेळी आपल्या प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहिले पाहिजे असे वाटत होते.त्यामुळे कशाचाही विचार न करता आम्ही आयोध्याला गेलो.त्यावेळी अनेक वाईट अनुभव आले.पोलिसांनी लाठी हल्ला केला.अटक केली.पण आज आभिमानाची गोष्ट झाली आहे.प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे.आणि आम्हाला याच देही यांच डोळे पाहता आला. आमच्या जीवनाचे सार्थक झाले असेही संभाजी शिंदे म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद देशपांडे यांनी केले तर आभार प्रशांत माळवदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण कलढोणे,मनोज कलढोणे,राजू कारंडे,राम तारळकर,मनोज डबाळ, रविंद्र कारंडे,धोंडीराम शिंदे,बाळासाहेब कलढोणे,राजू शिंदे, अमोल लंगोटे, पोपट इंगोले,गणेश तिवाटने व श्रीराम तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.