पंढरपूर प्रतिनिधी
आजचा हा निकाल हा शिवसेना कोणाची याबाबतीत होता आणि या निकालाकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले होते आणि आजच्या या निकालाने सिद्ध झाले आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांच्या वारसदारांची व निष्ठावंत शिवसैनिकांची आहे बाळासाहेब नेहमी म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठे पद कुठले तर ते म्हणजे शिवसैनिक आणि ते माझे दैवत आहे.
बाळासाहेब हे व्यक्ती नसूनही ते विचार होते आणि बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा व गुरुवर्यांची शिकवण घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ते पुढे घेऊन जात जनतेच्या हिताचे निर्णय घेताना दिसत आहेत आणि म्हणून त्यांच्याबरोबर लाखो शिवसैनिक हजारो पदाधिकारी आणि शेकडो लोकप्रतिनिधी हे बहुसंख्येने मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर उभे आहेत आणि लोकशाहीमध्ये बहुमताला खूप मोठे महत्त्व आहे.
म्हणून पुन्हा एकदा लोकशाहीचा लोकहिताचा कालचा निकाल लागलेला आहे न्यायव्यवस्थने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे कि ती मिरीट वर चालते सबळ पुराव्यावर चालते कि ती भावनेवरती चालत नाही आणि आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था ही सर्वोच्च मानली जाते आणि त्या न्यायव्यवस्थेच्या निकालाचा आम्ही आदर करतो आहे.
म्हणून काल या निकालाच्या निमित्ताने विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर नगरी मधून नामदेव पायरी जवळ सर्व लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसह वारकरी बांधवांना पेढे वाटून घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.
त्यांच्याबरोबर महिला संघटिका आरतीताई बसवंती माळशिरस महिला तालुका संघटिका जिल्हा उपसंघटिका त्याचबरोबर युवासेनेचे सुमित शिंदे महेशजी ताठे विकी मेटकरी वैभव पासलकर योगेश यादव लखन भोंडवे विक्र आसबे समर्थ साठे सारंग साठे सोनू माने गावडे रोहन बचुटे सागर कणसे कोरके तात्या घाडगे हे सर्व उपस्थित होते