सोलापूर प्रतिनिधी ॲड शिवाजी कांबळे
"न्याय आपल्या दारी" या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उच्च न्यायालयाचे साखळी खंडपीठ अर्थात सर्किट बेंच स्थापन होणे गरजेचे आहे. गेल्या दोन दशकापासून राज्यातील पुणे, कोल्हापूर आदीसह ईतर ठिकाणी साखळी खंडपीठाची निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील असे खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी उठाव झाला होता. आता त्या अनुषंगाने विचार करण्यास हरकत नाही , असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी केले, ते सोलापूर बार असोसिएशन च्या औपचारिक भेटीदरम्यान बोलत होते. खंडपीठ कोठे व्हावे याविषयी स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही, शिवाय खंडपीठ निर्मिती साठीचे निकष देखील निश्चित नाहीत, मात्र संबंधित जिल्ह्यातील दाखल होणारे न्यायिक खटले, आवश्यक ती उपलब्ध साधनसामग्री , जागेची उपलब्धता, त्यातून होणारे जनहित याचा याचा विचार होत असतो ,पश्चिम बंगालमध्ये अत्यंत छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील तीन-तीन बेंच उभारले गेली आहेत, त्याच धर्तीवर आपल्या राज्यात देखील अशी छोटी खंडपीठे स्थापन करायला हरकत नाही, त्यासाठीचे सर्वस्वी अधिकार देशाचे मुख्य न्यायमूर्तीना आहेत, त्याबाबत सकारात्मक दृष्टीने उठाव होणे गरजेचे वाटते, असे सांगून नवेदित वकिलांना श्रीहरीआणे यानी वकिली क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्पणी देखील सांगितल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड यांनी ॲड.आणे यांचे स्वागत केले, त्यांचा परिचय उपाध्यक्ष असीम बांगी यांनी करून दिला, बार कौन्सिल चे सदस्य ऍड. मिलिंद थोबडे यांनी सोलापूर मध्ये साखळी खंडपीठ उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे पोषक स्थिती स्पष्ट करून श्रीहरी आणे यांच्या कार्याचा गौरव देखील त्यांनी केला.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सचिव ॲड.करण भोसले यांनी केले ,यावेळी सीनियर व ज्युनिअर वकीलाच्या तुमचे शंका समाधान देखील श्रीहरी आणे यांनी केले.
यावेळी वकील संघाच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत लाडू वाटप करून करण्यात आले शिवाय नवीन वर्षात अनेक महत्त्वपूर्ण कामाचा संकल्प देखील करण्यात आला.
शेवटी आभार सहसचिवा ॲड.अनिता रणशृंगारे यांनी मानले .कार्यक्रमाचे उत्तम आणि नेटकेपणाने संयोजन खजिनदार ॲड .अविनाश काळे यांनी केले यावेळी ॲड .के चंद्रमोहन, सी.एम. सावंत, एल व्ही काटकर,डि.जी. चिवरी, बाबासाहेब जाधव, सोपान शिंदे, राजेंद्र फताटे, शिवशंकर घोडके, मल्लिनाथ पाटील, अशोक जालादी, एस.एस.पुजारी, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब नवले,बापू देशमुख, अश्विनी क्षिरसागर ,आधी वकिल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.