मुंबई प्रतिनिधी
कविता मनातली" काव्यसंग्रह ."गोष्टी तुमच्या आमच्या " ,"गोष्ट तुझी माझी" कथा संग्रह."खाद्यसंपदा "पाककृती संग्रह."मिश्किली" हास्यरस संग्रह आणि "बाताड्या थापाड्या", बालकाव्य संग्रह ."10X High Performance Strategy" व्यक्तिमत्व विकास या व अनेक पुस्तकांच्या यशा नंतर साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे, रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी "आळंदैश्वरा" या कवी प्रतिभाग्रज अर्थात सुरेश सोनवणे यांनी लिहिलेला काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी आणि गजलकार ए. के.शेख यांच्या हस्ते रेल्वे अधिकारी क्लब, निर्मल पार्क, भायखळा, मुंबई येथे संपन्न झाले .
सदर प्रकाशनास ज्येष्ठ कवयित्री आणि गजलकारा उर्मिला बांदिवडेकर ,गझलकार पत्रकार संदीप बोडके ,साहित्यसंपदा संस्थापक कथाकार वैभव धनावडे आणि प्रदीप पोळ (एडीआरएम ,मुंबई डिव्हिजन मध्य रेल्वे) ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरवात कवी गायक संतोष सकपाळ ह्यांच्या सरस्वती वंदनेने झाली. करोना काळातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा संघर्ष शिवराज मानसपुरे मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे ह्यांनी सांगताना उपस्थितांच्या काळजाला हात घातला.
कवियत्री सलोनी बोरकर ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कवयित्री जयश्री पवार ,कवी मोहन जाधव ,कवी शबाना मुल्ला ह्यांनी पुस्तकातील कविता सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले.कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन नंदिनी काळे ह्यांनी केले .
बी के श्रीवास्तव मुख्य यांत्रिक इंजीनियर मध्य रेल्वे,डी. डी. लोळगे, उपमुख्य इंजीनियर, मध्य रेल्वे,शिवकुमार मलभागे, उपमुख्य इंजीनियर मध्य रेल्वे
राजेंद्र थोरात उपमुख्य संरक्षा अधिकारी मध्य रेल्वे ह्यांनी रेल्वे सारख्या धकाधकीच्या आणि आव्हानात्मक कार्यक्षेत्रात सुरेश सोनवणे ह्यांनी आपली संवेदना जोपासली असे मत व्यक्त केले.
सुरेश सोनवणे हे भारतीय रेल्वेत उपमुख्य परिचालन प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. "आळंदैश्वरा" हा त्यांचा पहिलाच कविता-संग्रह आहे ज्यात विविध रसातील, विभिन्न प्रकारातील पंच्याऐंशी कवितांचा समावेश आहे.ज्येष्ठ गजलकार ए. के.शेख यांची प्रस्तावना या काव्यसंग्रहास लाभली आहे. चित्रकार आशीष महाजन यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि सुलेखन तसेच मनोमय मिडीयाची अंतर्गत सजावट असा वैशिष्ट्यपूर्ण "काव्यसंग्रह" रसिकांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.विविध विषयांवरील,विविध काव्यप्रकार नक्कीच वाचक रसिकांना भावतील,वाचन संस्कृतीस अश्या पुस्तकांच्या माध्यमातून चालना मिळेल असा विश्वास कवियत्री सीमा पाटील आणि कथाकार किरण बोरकर, कवी नारायण शिंदे छायाचित्रकार प्रशांत बद्रिके यांनी व्यक्त केला.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग लाभला.