ज्यांच्यासाठी स्वतःच्या रक्ताने कला साकारली जाते आणि ज्यांच्या प्रेमापोटी तरुणाई सर्वस्व पणाला लावायलाही तयार होते.. असा महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवता तारा कोण? अभिजीत पाटील!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी जाहीर केलेला महाराष्ट्रातील पहिला उमेदवार.
पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन.
५ वर्षात ६ साखर कारखाने यशस्वीरीत्या घेऊन चालवणारे.
तब्बल १२ वर्षे बंद पडलेला कारखाना फक्त ३५ दिवसांत त्यांनी सुरू करून दाखवणारे.
कारखान्यावर ट्रॅक्टरने ऊस पोहोचविणारा ते त्याच कारखान्यासह ६ साखर कारखान्यांचा यशस्वी मालक.
कोव्हिड काळात देशातील पहिला ऑक्सीजन प्लांट स्थापित करणारे समाजाभिमुख व्यक्तिमत्व.
२ वर्षे बंद असलेला कारखाना विठ्ठल कारखाना जिंकून विक्रमी सर्वाधिक रू.२८५२ दर जाहीर करणारे.. बहुआयामी लोकाभिमुख व्यक्तिमत्व.. अभिजीत पाटील!
*त्यांच्या दैदिप्यमान यशस्वितेचा प्रवास*
२००७ साली श्री.अभिजीत पाटील हे कारखान्यावर ट्रॅक्टरने स्वतः ऊस पोहोचवीत असत.
२०१० मध्ये सोनालिका ट्रॅक्टर एजन्सीची सुरुवात केली. संपूर्ण भारतात सर्वाधिक विक्री करणारी एजन्सी म्हणून अनेकदा सन्मान..
२०१३ पुणे-सोलापूर महामार्गासाठी सॅन्ड सप्लाय कंत्राट
२०१४ - हॉटेल विठ्ठल, पंढरपूरची स्थापना
२०१५ - यशस्वी कांदा निर्यात
२०१६ - डीव्हीपी स्क्वेअर, पंढरपूर
२०१७ - धाराशिव साखर कारखाना युनिट १, धाराशिव
२०१८ - धाराशिव साखर कारखाना युनिट २, नाशिक
२०१९ - धाराशिव साखर कारखाना युनिट ३, नांदेड
२०२० - धाराशिव साखर कारखाना युनिट ४, सांगोला
२०२१ - डीव्हीपी द मल्टीस्टेट को-ऑप.बँक अनेक ठिकाणी शाखा.
२०२२ - धाराशिव साखर कारखाना युनिट ५, बीड
२०२२ - विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.वेणूनगर गुरसाळे
२०२३ - विठ्ठल सहकारी साखर कारखाना बायो सीएनजी प्रकल्प शुभारंभ.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मातब्बर घराणे असलेल्या आमदार पुत्राला आणि इतर २ मातब्बर मंडळींना धूळ चारत संचालक पदाची निवडणूक यशस्वीपणे जिंकली व विरोधकांना दुसऱ्या पक्षात जाण्यास भाग पाडले.
संचालक पद मिळताच कारखान्यातील गरीब शेतकरी बांधवांची विरोधकांनी २-२ वर्षे अडवून ठेवलेली बिले देण्यास श्री.अभिजीत आबांनी सुरुवात केली. निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत २ वर्षांपासून बंद असलेल्या विठ्ठल कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक भाव दिला.
संपूर्ण देशातील पहिला ऑक्सिजन प्लांट त्यांनी चालू केला.. विठ्ठल सहकारी साखर कारखाना बायो सीएनजी हा नवा प्रकल्प सुरू केला. या प्रचंड कर्तृत्वामुळेच आज पंढरपुरातील प्रत्येक व्यक्तीच्या, युवकांच्या तोंडावर त्यांचेच नाव आहे.
अत्यंत शांत, संयमी व खंबीर स्वभाव, अभ्यासू, संवेदनशील आणि सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांची अत्यंत जवळून त्यांना जाण आहे.. कार्यासाठी सदैव तत्पर आणि कोणाच्याही मदतीला कायम धावून जाणारे असे हे व्यक्तिमत्व.
जिवाभावाच्या मित्राला जीवघेण्या आजाराने घेरलं.. बऱ्याच उपचारानंतर डॉक्टरांनी तातडीने मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला, मात्र एवढ्या लवकर मुंबईला हलवावे कसे? हा सर्वांसमोरच प्रश्न होता, त्यावर उत्तर एकच होते अभिजीत आबांच्या कर्तुत्व!! या पठ्ठ्याने मित्रासाठी एअर ॲम्बुलन्स बोलावली आणि हे ॲम्बुलन्स मधून विमानाने मित्राला उपचारासाठी मुंबईला दाखल केले.. या निखळ, निस्वार्थ आणि जीवाला जीव देणाऱ्या मैत्रीला आपण काय म्हणाल?? अशी अनेक उदाहरणे आहेत.. म्हणूनच आज युवाशक्ती आबांसाठी काहीही करायला तयार होते.
अभिजीत आबा हे असं व्यक्तिमत्त्व आहे की, जे पंढरपूरच्या तरुण पिढीच्या मनामनात राज्य करत आहे, सर्व युवा पिढी ही आबांना मंगळवेढा - पंढरपूरचे भविष्य म्हणून बघत आहेत. हा आज प्रत्येक युवकाच्या अंतरंगाचा आवाज आहे.. राजकारणातील दूरदर्शी व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेब यांनी देखील अभिजीत पाटील यांचे नाव जाहीर करताना असेच गौरवोद्गार काढले होते. एवढा मोठा नेता जेंव्हा भर सभेत उमेदवारी जाहीर करतो तेव्हा त्यामागे काहीतरी मोठे कारण असणार हे निश्चित.
चेअरमन.अभिजीत पाटील यांच्या घराण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण इतिहास!
इसवी सन १६५९-६१ अफजल खान व मुगल आणि १६९५-९९ या काळात औरंगजेबच्या आक्रमणातून हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात येत होती. आक्रमणापासून सुरक्षिततेचा उपाय म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर मंदिराचे प्रल्हाद महाराज बडवे यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती देगाव गावाचे सूर्याजी पाटील (अभिजीत पाटील हे त्यांचे यांचे १३ वे वंशज आहेत) यांच्याकडे सुरक्षितेकरिता आणि सांभळण्यास दिली. या मूर्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी त्यांनी सर्वस्व वेचले.. त्या परंपरेचे पाईक असणारे अभिजीत पाटील वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाजसेवेसाठी अविरत प्रयत्नरत असतात.