महाराष्ट्रातून हजारो जपकारांची उपस्थिती मुळे सांगोला नगरी राममय
सांगोला प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेले चैतन्य जप प्रकल्पाचे हे २३ वे राज्यस्तरीय शिबिर सांगोला येथे रामकृष्ण गार्डन येथे सद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने आदरणीय प.पू.श्रीपाद काका जोशी यांच्या प्रेरणेने आणि शिबिर प्रमुख धैर्यशीलभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९-२० नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.पहाटे पासून काकड आरतीने सुरूवात होऊन भक्तीमय वातावरणात रामनाम जपात भाविक तल्लीन होत आहेत.यावेळी सकाळी महाराजांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक हत्तीवरुन निघाली.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे संजीव देखावे ,राम लक्ष्मण सजीव देखावा,शबरीराम भेटीचा देखावा सांगोला नगरी तून निघत सांगोला नगरी राममय झाली होती.
त्यानंतर सकाळी १०:३०वा.पूजनीय रामदासबुवा रामदासी,जपकार श्री व सौ हौसाबाई पिराजी धायगुडे, आमदार शहाजी बापू पाटील आमदार सुभाष देशमुख मा.आमदार दीपक आबा साळुंखे, डॉ.बाबासाहेब देशमुख,प्रा.पी.सी.झपके सर, जयमाला गायकवाड,शिबिर प्रमुख धैर्यशीलभाऊ देशमुख अध्यक्ष नंदकुमार जोशी आदींच्या शुभहस्ते उद्घाटन झाले असताना धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी प्रास्ताविक करताना या शिबिराचे आयोजन का केलं जाते याची पार्श्वभूमी भाऊंनी सांगत प्रत्येक जातीधर्मातील लोक यामध्ये सहभागी होऊन रामनामाचा प्रचार प्रसार करतात.याचा अभिमान वाटतो.यानंतर मोहनबुवा रामदासी यांनी सांगितले की रामनाम जपाने अनेकजण उध्दारून गेले आपल्याला शाश्वत सुख पाहिजे असेल तर रामनामाशिवाय पर्याय नाही.आमदार सुभाषबापू यांनी सांगितले की हे शिबिर प्रथमच होत आहे त्याच उद्घाटन आमचं शुभहस्ते होत आहे हे आमचं सद्भाग्य असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.दीपक आबा यांनी सांगितले की रामनामुळे लोकांचं आयुष्य कसं बदलत यांचं ज्वलंत उदाहरण हे जपसंकुल प्रकल्प आहे.शहाजी बापू यांनी धर्माची पताका उंचवण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरे करतात परंतु नामजपातील ताकत सर्वांत जास्त आहे.तो तुम्ही करताय यांचा आज आनंद वाटला.त्यासाठी दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात जपकारांची मनोगते, सामुदायिक रामनाम जप,भजन,नाटिका, जपकारांची मनोगते,नारदीय कीर्तन विलासबुवा गरवारे यांच अप्रतिम कीर्तन संपन्न झाले.
त्यांना तबलासाथ चैतन्य गरवारे,पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम निखिल कुलकर्णी यांनी केली. त्यानंतर रविवारी नाटिका सादर होणार आहे तसेच शिबिराचे प्रमुख कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख यांचे प्रवचन संपन्न होणार असून श्रीपाद जोशी यांनी लिहिलेल्या चारोळ्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न झाले.तसेच या शिबिराची सांगता ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या अमृतवचनाने होणार आहे.
अशा या शिबिरात महाराष्ट्रातून हजारो जपकार,नामप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर महाराजांच्या आशिर्वादाची खुप चमकत असताना दिसत होती सर्वजण धन्य धन्य वाटतंय अशी भावना व्यक्त करीत असताना दिसत होते.शिबीर यशस्वी करण्यासाठी सांगोला जप संकुलाचे सर्व जपकार आणि नामप्रेमी आर्ट ऑफ लिव्हिंग चे साधक अधिक परिश्रम घेत आहेत.