विरार प्रतिनिधी
विरार महानगरपालिका वाचनालय हाॅल, विरार-पूर्व, येथे 'काव्यप्रेमी शिक्षक मंच' च्या पालघर जिल्हा अध्यक्षा कवयित्री किशोरी शंकर पाटील, विरार, यांनी हे संमेलन आयोजित केले होते. यासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून सल्लागार अॅड. बाळासाहेब तोरसकर आणि उद्घाटक डाॅ. अलका नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून 'काव्यप्रेमी शिक्षक मंच'चे सल्लागार कमलाकर संखे लाभले होते.
मुंबई, ठाणे,बोईसर, पालघर भाईंदर दूरवरून कवी उपस्थित होते आणि सर्वांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या. संगीतमय सूत्रसंचालन निलेश हेंबाडे केले. सुचित्रा पितळे यांच्या सुंदर स्वागतगीताने व सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने काव्यसंमेलनाला सुरूवात झाली.
प्रास्ताविकात किशोरी शंकर पाटील यांनी "काव्यप्रेमी प्रेमी शिक्षक मंच" च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. अध्यक्षांचा सन्मान शाल श्रीफळ देऊन उद्घाटक डाॅ. अलका नाईक यांनी केला. किशोरी पाटील यांनी डाॅ.अलका नाईक यांना शाल व पुष्प देऊन सन्मानित केले.
गझलकार कमलाकर संखे यांना योगेश गोतारणे यांच्या हस्ते शाल पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कवयित्री सरोज गाजरे यांनी आभार प्रदर्शन केले.
संमेलनाध्यक्ष आणि काव्यप्रेमी शिक्षकमंच राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब तोरसकर यांनी संत तुकाराम यांच्या अभंगातील दाखले देत ओघवत्या भाषेत छान मार्गदर्शनपर भाषण केले. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. त्यांनी आपल्या दोन रचना सादर केल्या. सुंदर अशी भक्तीमय अभंग रचना गाऊन सादर केली. अतिशय भावली.
'काव्यप्रेमी शिक्षक मंचा'च्या मुंबई जिल्हा अध्यक्षा कविवर्या डाॅ. अलका नाईक यांनी आपल्या भाषणात कवितेविषयी बोलताना "शब्दांनी साकारलेली अंतर्मनाची हळुवार स्पंदने म्हणजेच कविता"... असे सांगून त्यांचे विचार मांडले. त्यांनी शिवाजी महाराजांवरील स्वरचित पोवाडा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या सुंदर कविता सुमधुर आवाजात गाऊन सादर केल्या. समाजसेविका म्हणून अवयवदान, केशदान इ. संबंधी त्यांनी माहिती दिली आणि माहितीपत्रके, कार्डे सर्वांना दिली. तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या कार्याबद्दल माहिती दिली.
ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार श्री.कमलाकर संखे यांनी आपली गझल सादर करून गझल काव्य लेखनाविषयी अतिशय उपयुक्त विचार मांडले.
यावेळी कवयित्री शुभम पाटील यांना मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून पदभार सोपविण्यात आला.
सहभागी मान्यवर कवी /कवयित्री
•कल्पना म्हापूसकर,
•सरोज गाजरे,
• शुभम पाटील,
•मोहन वायकोळ,
• प्रकाश जाधव,
•प्रमोद सूर्यवंशी,
• हरिश्चंद्र मिठबावकर,
पंकज जावळेकर
•वैशाली चौधरी,
•मीना ठाकोर,
•समीर बने,
•स्वाती नाईक,
•सुनिता महाजन
•संजना वेतूरकर,
•प्रतिभा नवघरे,
• गीताश्री नाईक,
• राकेश डाफळे,
• पुनमचंद्र पाटील,
•विठ्ठल घाडी
• विलास देवळेकर
सर्वांच्याच कविता खूप भावस्पर्शी होत्या.
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.