सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी सात वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकार कडे वारंवार पत्रव्यवहार करत आहे गेली सात वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती वतीने
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचे अनेक विषय शासन दरबारात धूळ खात पडले आहेत. पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख प्रा अजय दासरी यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या अडचणी व समस्या शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा अजय दासरी यांच्या कानावर घातल्या.
पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत फार मोठी चळवळ उभी केली असून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न आपण शासन दरबारात मांडणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख प्रा अजय दासरी यांनी सांगितले आहे