वर्धा प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर पाल, तांडा, वस्ती, शहर, सर्वत्र भटक्या विमुक्त जमातीच्या मंडळींना शिबीर लावून निवडणूक नोंदणी, राशनकार्ड, आधार कार्ड, रहवाशी दाखला , जातप्रमाणपत्र,श्रवणबाळ योजना, निराधार योजना, असे प्रमाणपत्र देण्यासाठी माननीय श्री राहुल कर्डीक जिल्हाधिकारी वर्धा यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व BDO, तहसीलदार, सामाजिक न्याय विभाग श्री कुलकर्णी साहेब , विविध विभागाचे अधिकारी व भटके विमुक्त जमातीचे कार्यकर्ते यांना सोबत घेत कॅम्प चा दिनांक 5 ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत सर्व तालुक्यात शिबीर घेऊन प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले.
आज मिटींग मध्ये, गवळी, बंजारा, वंजारी, बेलदार , भोई, भामटी, गोसावी, मदारी, धनगर , गाडी लोहार, लोहार, सरोदे, वडार,भराडी, नाथजोगी, बहुरुपी, समाजाचे मंडळी उपस्थित होते. सर्वांनी आपले प्रश्न मांडले.
२०१५ ला सामाजिक न्याय मंत्रालय, यांनी लिहलेल्या पत्रानुसार सर्व जिल्ह्याला भटक्या विमुक्त जमातीला शिबीर लावून , सर्वेक्षण करून तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी करावे असे पत्र आले होते, त्यानुसासर कमिटी स्थापन करणे ही होते, त्यानुसार हे कार्य सर्व राज्यात सुरू आहे.
आज वर्धा जिल्हा चा आढावा घेत असताना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना चे अपडेट घेतले, वस्ती - वस्ती ची माहिती, घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी नोंद करून घेतली, घराचे पट्टे, वन जमीन,सर्वांची चर्चा करून लवकरचं जिल्हा व तालुका स्तरावर समिती स्थापन करण्याच्या सूचना ही माननीय श्री राहुल कर्डीक जिल्हाधिकारी साहेबांनी दिल्या.
मुकुंद अडेवार, प्रकाश बमनोटे, अनिल चव्हाण, राजू भाऊ कळसाईत,किरण पारिसे,संजय नान्हे,संजय कोपुलवार, संजय कोटेवार, द्वारकाताई इमडवार, सोनालीताई कोपुलवार, सुनील दुप्पलीवार, रुपेश कुचेवार, सय्यद शाबीर ,सय्यद रामत, रवींद्र चव्हाण,दिलीप उपासे, लताताई जाधव,श्री अशोक आकुलवार, रमेश कच्छवाह, नाना राठोड,उद्धव गाडेकर,प्रमोद मुंडे,संजय जाधव, आणि अनेक भटक्या जमातीचे सदस्य उपस्तीत होते.