पंढरपूर प्रतिनिधी
" सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य हे जगातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य असून, त्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे, तसेच आपल्या महाराष्ट्रास सर्वात अधिक जैव विविधता असलेला भूभाग लाभला असून त्याचेही संवर्धन करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे (सुटा) सदस्य व डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला चे सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र शंकरराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
एम आय टी जुनियर कॉलेज वाखरी येथे आयोजित केलेल्या" जैव विविधता , संवर्धन व युवकांचा सहभाग " या विषया वर ते बोलत होते . यावेळी भारतातील सर्व नष्ट होत चाललेल्या वनस्पती व प्राण्यांची माहिती व त्याचे गांभीर्य पॉवर पॉईंट च्या सहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी कॉलेज चे प्राचार्य विरेंद्र बावस्कर यांनी शाल, श्रीफळ व संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला . अनमोल वेळ देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्रा. नारायण देशपांडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शंकर सोनटक्के, प्रा. समीर मुलाणी,प्रा. आदित्य शेप, प्रा.नरेंद्र नजरधणे ,प्रा.सचिन भडंगे, प्रा.शुभम तकिक यांनी परिश्रम घेतले.