सोलापूरमध्ये हुरडा महोत्सव घेण्याचे आवाहन
सोलापूर प्रतिनिधी
जागतिक पर्यटन दिनानिमित्त ड्रीम फौंडेशन ,बसव संगम शेतकरी गट व ड्रीम टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे बुधवार दि 27 सप्टेंबर रोजी सकाळी समाजकल्याण केंद्र रंगभवन येथे सोलापुरातील पर्यटन संधी व जबाबदारी यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते झाले
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ,अस्मिता गायकवाड शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख, कुमार दादा करजगी,उद्योजक व शिक्षणतज्ञ,दीपक आर्वे,निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कृषी पर्यटन केंद्र संचालक व पर्यटकांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले की सोलापूर मध्ये दरवर्षी करोडो लोक भेटी देतात,याठिकाणी धार्मिक,कृषी पर्यटन भरपूर संधी आहे,यामुळे लोकांना रोजगार मिळेल,आपल्या सोलापूरचे ब्रँडिंग करा,सेंद्रिय शेतमाल लोकांना द्या,कृषी पर्यटन साठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बैठक घेऊ आणि आपले कोणतेही अडचण कृषी पर्यटन केंद्राचे असेल तर सांगा प्रशासन आपल्या सोबत आहे असे शब्द जिल्हाधिकारी यांनी दिले व सोलापूर मध्ये मोठा हुरडा महोत्सव भरविण्यात यावे असे आवाहन केले आणि सर्वांनी यात भाग घ्या सेलिब्रिटी बोलवा आपले खाद्य संस्कृती, सोलापूरची ओळख लोकांना सांगा असे सांगून सर्वांशी संवाद साधले यावेळी विविध कृषी पर्यटन केंद्र संचालक सहभागी झाले होते.
यामध्ये मा,राजू भांडरकवठेकर अभिषेक मळा,,राजेंद्र सुरवसे ,श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम, सुधीर जाधव ,वनाप्रस्थ कृषी पर्यटन केंद्र, प्रभाकर गुंगे,रत्नाई शिवार विजयकुमार सिंगी,सिंगी मळा, परमेश्वर शरणार्थी कल्याणम कृषी पर्यटन केंद्र,मीना शहा,सुग्रास फार्म,मधुर बजाज पिकनिक पॉईंट,श्रीसुनील बाबानागरे,वळसंगवाडा, संगप्पा केरके,श्री संगमेश्वर मंदिर सुधारणा समिती हत्तरसंग कुडल उषा हंचाटे,योग शिक्षिका ,संगिता पाटील ड्रीम टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मा लहू आवताडे,खंडोबा ऍग्री प्रोड्युसर कंपनीचे परमेश्वर कुंभार,नकलाकार अंबादास कनकट्टी,ह,दे प्रशाला मुख्याध्यापक कांबळे ,अभिनंदन विभूते,मयूर गवते,विजय पटणे आदी उपस्थित राहून विचार व्यक्त केले.
कार्यक्रमात बोलताना अस्मिता गायकवाड यांनी कृषी पर्यटन केंद काळाची गरज असून सर्वांनी सगळे एकत्र येऊन विचार विनिमय करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दीपक आर्वे साहेबांनी कृषी पर्यटन मधून युवकांना रोजगार मिळेल व कृषी माल विक्री साठी व्यासपीठ मिळेल असे सांगितले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ भतगुणकी यांनी केले,स्वागत उषा हांचाटे यांनी केले सूत्रसंचालन संगिता पाटील हिने केले तर आभार व शिवछत्रपती यांचा पोवाडा शाहीर रमेश खाडे यांनी गायिले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुनीत बिज्जर्गी, श्रुती उल्लागड्डे,कुंभार सर,हशिब पटेल,कल्लाप्पा भतगुणकी यांनी परिश्रम घेतले,कार्यक्रमास मोठ्या संख्येने कृषी पर्यटन केंद्र संचालक उपस्थित होते.