भाळवणी प्रतिनिधी
नीरा उजवा कालवा खरीप हंगाम पाणी पाळी बाबत, तांदुळवाडी आणि ब्रांच २ वरील शेतकरी यांना माहिती साठी प्रसिद्ध करत आहोत.अशी माहिती शेतकरी सुरेश देठे,जयंत शिंदे व ऍड. नागेश काकडे यांनी दिली आहे.
शेतकरी बंधूनो खरीप हंगाम पाणी पाळी दिनांक २७ जुलै रोजी सुरू झाली.वास्तविक पाहता दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत ब्रांच २ सुरू होणे अपेक्षित होती ,परंतु ती दिनांक १४ ऑगस्ट म्हणजे किमान १५ दिवस उशिरा सुरू झाली .परंतु ब्रांच २ ची वहन क्षमता किमान १३० असताना ती ८० ते १०० वर ठेवली जाते आहे.ब्रांच २ वगळता कोणताही फाटा असा कमी क्षमतेने काढला जात नाही.
आज पर्यंत सांगोला तालुक्यात आणि फलटण तालुक्यात त्यांना अधिकृत पाणी सुरू आहे. माळशिरस मध्ये शाखा नंबर १ खंडाळी पूर्ण झाल्यानंतर ब्रांच २ पूर्ण क्षमतेने सुरू होणे अपेक्षित असताना वरच्या भागातील फाटे ६१,५८,५२ जे कोणते असतील ते सुरू करण्यात आले आहेत.त्या भागातील मोठाले तलाव भरण्यात आले.परंतु माचणुर विभागात येणारे फाटे अद्याप बंद आहेत.यावर कुणाकडे दाद मागायची हा मोठा सवाल आहे.कारण जे कालवा सल्लागार समिती मध्ये आहेत ते मूग गिळून गप्प बसतात. ब्रांच दोन ला उन्हाळा हंगाम मध्ये एकच पाणी पाळी द्यावी असा ठराव कालवा सल्लागार मध्ये आल्यानंतर याला आपल्या तालुक्यातील सदस्यांनी विरोध केला हे ऐकिवात नाही.माळशिरस किंवा सांगोला ,पंढरपूर तालुक्यातील एकही पुढारी या भागाला पाणी मिळावे म्हणून आग्रही राहतं नाही. आणि आपल्या शेतकऱ्यांची एकी होणार नाही,जे पुढे होऊन करेल त्याला मागे ओढणे,त्याला अडचण आली पाहिजे असले उद्योग करणे हे गेली १० वर्ष आम्ही अनुभवतोय.
आज ४५० डिस्चार्ज फलटण,३०० पर्यंत सांगोला आणि बाकी पाणी माळशिरस तालुक्यातील वितरिकाना सुरू आहे.ब्रंच २ ला फक्त ८० डिस्चार्ज पाणी आहे .कुठून पाणी वाढणार आहे ,आणि कधी डी४ , २/१३ साठी पाणी मिळणार याचे उत्तर कुणाकडे आहे हे माहीत नाही. यासाठी शेतकरयांना लढावं लागेल.बारमाही ब्लॉक धारक भागात आपण असून देखील सापत्न वागणूक मिळत आहे. माचनुर उपविभाग कुणी बनवला,बनवला तर त्याला स्वतंत्र कोठा आणि पाणी का दिले जात नाही याचा आपण अभ्यास करणे गरजेचे आहे.
फक्त एकमेकांना खाली वर पाहणे,सोसायटी चेअरमन फक्त पाणी आल्यापुरते पुढे होणे,आपलं भिजल की झाल, ही भावना,याला कुठे तरी लगाम लागला पाहिजे,शेतकऱ्यांनी पास टाकले पाहिजे ,पैसे भरले पाहिजेत.तर आणि तरच आपण आपला हक्क अबाधित ठेऊ शकतो.अन्यथा तुम्हाला पिके जागेवर होरपळत असताना पहावी लागतील.
हे सगळं लिखाण कुणाला चुकीचं वाटत असेल तर आम्ही माफी मागतो.मी स्वतः गेली अनेक वर्ष संघर्ष केला,परंतु येवढ्या वर्षात जर १० लोक संघर्षाला तयार होत नसतील तर मी सुधा हा अन्याय सहन करणाऱ्या बरोबर राहिले पाहिजे .असे मत ऍड. नागेश काकडे यांनी सांगितले.
यात काही बदल अपेक्षित असेल तर मळोली ,तांदूळवाडी,धानोरे ,शेंडे चिंच, तोंडले, भाळवणी, शेंडगेवाडी इ.गावातील तरुण सहकाऱ्यांनी पुढे होऊन लढायला तयार झाले पाहिजे,आम्ही नक्की आपल्या सोबत असू.जे कुणी कोणताही पक्ष,पार्टी असुदे याकाळात लढतील त्यांना पूर्ण गाव भविष्यात डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाही.अन्यथा दूष्काळास कायमस्वरूपी तोंड द्यावे लागेल.