सोलापूर प्रतिनिधी
सनातन हिंदू वीरशैव अध्यात्मिक संस्कार केंद्र व श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर संयुक्तरित्या आयोजित सामूहिक लघुरुद्र पठण सोहळा श्री. शिवानुभव मंगल कार्यालय मीठ गल्ली सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्धिष्ट हे पुरुषोत्तम अधिक श्रावण मासात विश्वकल्याण, जनकल्याण त्याप्रित्यर्थ श्री.शिवयोगी सिद्धरामेश्वर स्थापन केलेले कामेश्वर लिंगाला सामूहिक लघुरुद्र पठण व महापूजा,असंख्य माता भगिनी व शिवाचार्य,आणि वैदिक वैदिक वृंदांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लघुरुद्र सोहळा कार्यक्रमातील धर्मसभेत पुरस्कार गौरव सोहळा, श्री.श्री.ज्ञान सिंहासनाधीश्वर जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या अमृत हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी श्री.ष.ब्र श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी,नागणसुर, श्री.ष.ब्र.निलकंठ शिवाचार्य स्वामीजी, श्री.ष.ब्र सदाशिव शिवाचार्य स्वामीजी, वेळापुर, म.नि.प्र श्री स्वामीनाथ स्वामीजी किरीटमठ सोलापूर, बसवराज शास्त्री हिरेमठ,श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ संस्थापक डॉ. शिवयोगी शास्त्री होळीमठ,श्री. बसवराज पुराणिक, माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, सिद्धय्या स्वामी हिरेमठ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाले.
या कार्यक्रम वेळी श्री.काशी जगद्गुरु आशीर्वचनात म्हणाले की, "भारतीय सर्व धर्मग्रंथाच्या मूलग्रंथाना निगमागम असे म्हणतात.भगवान शिवाच्या नि:श्वासातून उत्पन्न झाले ते निगम व शिवाच्या मुखातून वाणी वाटे आलेले, आगम होत.म्हणून निगमागम प्रत्यक्ष शिवा पासून प्राप्त झाले,त्याचा कोणी मानव कर्ता नाही म्हणून त्यांना अपौरुषीय वाड.मय म्हणतात.
वेदात शिव,रुद्र, इष्टलिंग पूजा इत्यादींचे वर्णन आढळतो. यापुढेही जगद्गुरुनी म्हणाले की, "गुरुकडून दीक्षापूर्वक घेतलेले इष्टलिंग कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या शरीरावरून बाजूला काढून ठेवू नये, इष्टलिंग पूजा हे नित्य कर्म आहे.मृत्यू नंतरहि तेच इष्टलिंग शरीरावर ठेवून भूमीमध्ये अंत्यक्रिया समाधी दिली जाते"
आजच्या श्री.वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळाच्या आणि सनातन हिंदू वीरशैव आध्यत्मिक संस्कार केंद्र आयोजित सामूहिक रुद्र पठण व पुरस्कार सोहळा इत्यादी गोष्टी कौतुकास्पद व अभिनंदनीय आहेत असेही"म्हणाले.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेले सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज प्राचार्य डॉ. शंकर नवले ,प्रा डॉ.विद्युलता पांढरे, प्रा.श्री विद्यानंद स्वामी सर,प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी आणि कु साक्षी प्रकाश राठोड यांना फेटा,मोतीहार, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रस्तावना डॉ. शोभाताई कराळे,आणि सूत्र संचालन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी आणि आभार प्रदर्शन वकार्यक्रम संपूर्ण नियोजन वे. ईश्वर स्वामी होळीमठ यांनी केले.
या कार्यक्रमात विजयकुमार स्वामी, प्रसाद गजभार, राजशेखर स्वामी, कल्लय्या शास्त्री गणेचारी,परमेश्वर शास्त्री हिरेमठ, धनराज होळीमठ, राजशेखर कोले, विजयकुमार भोगडे, संगय्या स्वामी शेगाव आदीनीं परिश्रम घेतले.