भाळवणी प्रतिनिधी
उजनी धरणातून डावा उजवा कालवा तसेच भीमा नदीला पाणी सोडण्यासाठी उपरी तालुका पंढरपूर येथे भव्य रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी उपरी गावातील दुकाने कडकडीत बंद ठेऊन या मोर्चाला पाठींबा देण्यात आला. आंदोलना दरम्यान शेतकर्यांनी पाण्याअभावी करपू लागलेला ऊस हातात घेऊन कालवा सल्लागार समिती, भीमा पाटबंधारे विभागाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी उजनी चे पाणी नदी आणि कॅनॉल सोडा अन्यथा पंढरपूर येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बायका लेकरं जनावरा सह घुसणार आहे. आम्ही सगळे जसे शासनाचे लाभार्थी आहोत तशीच आमची जनावरे सुद्धा या शासनाची लाभार्थी आहेत.
गेली 3 महिने या परिसरात पाऊस झाला नाही.त्यामुळे
पाण्यावाचून शेतकऱ्यांची पिकं जाळली आहेत.शेतकरी वर्गाने बँकेची कर्जे काढून पिकांची पेरणी केली आहे. पिके चांगली आली दर चांगला मिळाला तरच बँकेची कर्जे फेडली जातील अन्यथा शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या.
मागणी करून ही पाणी नाही सोडले तर सर्व पिकं पाण्यावाचून जळून जातील,चारा नसल्यामुळे पशुधन भाकड होतील.यांची सर्व जबाबदारी शासनास घ्यावी लागेल.
मग शेतकऱ्याने बँका,पतसंस्था,सोसायटी,खासगी सावकारांची कर्जे भरायची कशी ?
पहिल्या पालकमंत्र्यांनी उजनीचे पाणी बारामतीला पळवले,आताचा पालकमंत्री पाणी सोडलं की बंद करत नाही आणि बंद केलं की सोडत नाही
व्यथा सोलापूर जिल्ह्याची झाली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी जनजागृती समिती, रयत क्रांती संघटना, राष्ट्रवादी पक्ष, मनसे या सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच परिसरातील शेतकरी बहु संख्येने रास्ता रोको मधे सहभागी झाले.
रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झाली होती. निवेदन स्वीकारल्या नंतर पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.