पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील दहावी बारावी व विविध स्पर्धेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच लोणारी भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. बी.पी महाविद्यालय पंढरपूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.दत्तात्रय काळेल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर पंकज खांडेकर हे होते.
प्रमुख पाहुणे खांडेकर यांनी परिश्रमाशिवाय यश मिळू शकत नाही असे सांगितले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.काळेल यांनी स्पर्धेच्या युगामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे तरच यश मिळणे शक्य आहे असे सांगितले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने पुढील वर्षी दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास त्याचप्रमाणे बारावी मध्ये कला ,विज्ञान व वाणिज्य या विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी 501 रुपये व प्रमाणपत्र त्यांचे लहान बंधू स्व. युवराज काळेल यांचे स्मरणार्थ पारितोषिक ठेवल्याचे घोषित केले.
या कार्यक्रमाचे आयोजन विष्णुपंत दादरे लोणारी पुरुष बचत गट पंढरपूर यांनी केले होते. याप्रसंगी बचत गटाचे अध्यक्ष नगरसेवक मा.नवनाथ भाऊ रानगट उपाध्यक्ष श्री .पांडुरंग दाजी खांडेकर सचिव श्री .सिद्धेश्वर हिप्परकर, सुभाष गव्हाणे, तानाजी गेंड, दत्तात्रय नरळे,लक्ष्मण बाड,सर सागर गोडसे ,कृष्णा पाटसकर ,डॉ.खांडेकर , महादेव काळेल, डॉ.अजित काळेल, हनुमंत खिलारे, बालाजी शिंदे, मेजर काळेल,लिमगिरे गुरुजी, दिलीप रानगट्टटे, सुहास गळवे आटपाडकर साहेब, अविनाश हिप्परकर, योगीराज खिलारे,समाधान खांडेकर तसेच महिला बचत गटाच्या बहुसंख्य महिला सुद्धा उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब खांडेकर यांनी केले तर आभार पोपट काळेल यांनी मानले.